केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक रस्त्ये व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा हा कमावलेला आहे असा आरोप केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी […]
Latest News
6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक
भारताने झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका खिशात घातल्याने तिसरा सामना औपचारिक आहे. या सामन्यात भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली. त्यामुळे दोन्ही बाजूने आक्रमक फलंदाजी पाहायला मिळेल असं वाटलं होतं. पण अभिषेक शर्मा या सामन्यातही फेल गेला. त्याने 4 चेंडूंचा सामना केला आणि […]
लाल भेंडी करणार मालमाल; बाजारात आणताच संपणार, कमाईचे गणित समजून घ्या
Red Ladyfinger Cultivation Tips: अनेक भारतीय घरात भेंडी आवडीने खाल्ली जाते. लहान मुलांना तर भेंडी आवडतेच डब्यासाठीही ही भाजी देण्यात येते. बाजारात भेंडीची वर्षभर मागणी असते. बाजारात हिरवी भेंडी मिळते. तर काही वेळा पांढरी भेंडी मिळते. ही गावरान भेंडी आमटीसाठी चांगली मानली जाते. त्याचवेळी लाल रंगाच्या भेंडीचे मोठे आकर्षण आहे. ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. […]
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी दिलासादायक माहिती दिली आहे. ई-केवायसी पूर्ण न झालेल्या महिलांना आता घाई करण्याची गरज नसून सरकारने त्यासाठी 6 महिन्यांची मुदत दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. विशेषतः ई-केवायसी न झाल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळणार का, […]
SL vs IND : श्रीलंका दौऱ्यातून या खेळाडूचा पत्ता होणार कट! कसोटी मालिकेसाठी या दिवशी संघाची घोषणा
भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना 15 ऑगस्टला असणार आहे. असं असताना या सामन्याच्या निदान 15-20 दिवसाआधीच संघाची घोषणा होणं भाग आहे. असं असताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबाबत अपडेट दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं की, कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा 28 जुलैला होऊ […]
‘या सरकारचे शंभर अपराध झाल्यानंतर…,’ काय म्हणाले अंबादास दानवे ?
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर होणारच होता. देशभरात तरुणाई आणि विद्यार्थ्यांचा जो रोष होता. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नसता तर हा रोष आणखी वरपर्यंत गेला असता, राजीनामा मागणं हे योग्य होतं आणि त्यांनी राजीनामा दिला, हेही योग्य झालं असल्याचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. नीट पेपर फुटीच्या प्रकरणात […]