लातूर येथील साई नाका परिसरात रोहन वाईन्स अँड बिअर शॉपजवळ दिवसाढवळ्या एका तरुणावर कोयताने प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच विवेकानंद चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोरांचा […]
Archives for August 2026
Vanita Kharat: वनिता खरातचा WhatsApp हॅक, अनेक मित्रांनी पाठवले पैसे, नेमकं काय घडलं?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात हिच्यासोबत फसवणुकीची मोठी घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिने सर्वांना याबद्दलची माहिती दिली आहे. एका मोठ्या कुरिअर कंपनीच्या नावाने तिच्यासोबत हा स्कॅम झाला आहे. तिचा व्हॉट्सअॅप नंबर हॅक करून कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना आर्थिक मदत करण्याविषयी एक मेसेज पाठवण्यात आला होता. अनेकांनी काळजीपोटी पैसेही पाठवले. […]
दादा कोंडके यांच्या डबल मिनिंग विनोदावर अशोक सराफ स्पष्टच बोलले, ‘असे विनोद लोकांना आवडतात, पण फार काळ…’
मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी दादा कोंडके यांचे सिनेमे आणि त्यांच्या डबल मिनिंग कॉमेडीबद्दल मोठं वक्तव्य केलं. अशोक सराफ, दादा कोंडके यांच्या डबल मिनिंग विनोदांवर मत व्यक्त केलं आहे. अशोक सराफ म्हणाले, 'मी त्यांच्यासोबत 3 सिनेमांमध्ये काम […]
चव भारी पण आरोग्यावर भारी? मसालेदार पदार्थांमुळे शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
आपल्यापैकी अनेकजण मसालेदार आणि तिखट पदार्थ खाण्याचे खूप शौकीन आहेत. त्यात मसालेदार पदार्थ भारतीय जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. कारण मिरची आणि मसाल्यांमुळे पदार्थांला चव, सुगंध आणि खास तिखटपणा मिळतो. मिरचीतील कॅप्सायसिन या घटकामुळे तिखटपणा जाणवतो. मिरची खाल्ल्यानंतर कॅप्सायसिन शरीरातील विशिष्ट रिसेप्टर्सना सक्रिय करते आणि त्यामुळे उष्णता किंवा जळजळ जाणवते. मात्र, तिखट पदार्थांचा परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर […]
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
पुणे महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील स्थानिक पातळीवरील संघर्ष तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी आपल्या प्रभाग दोनमधील १२ कोटी रुपयांचा विकास निधी राजकीय सूडबुद्धीने शून्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. डिंगरे यांच्या मते, मागील काळात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या चौकशीसाठी आणलेल्या प्रस्तावाला त्यांनी अनुमोदन दिले […]
भटक्या कुत्र्यांकडून चावा, तर मोकाट गायीचा हल्ला… राज्यातल्या दोन घटनांनी वाढवली चिंता
शहरांमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. एका बाजूला भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे मोकाट गायींच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी होत आहेत. कारंजा आणि धुळे इथं समोर आलेल्या दोन घटनांनी हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. कारंजा शहरात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्यानंतर नगरपालिकेनं […]