• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भटक्या कुत्र्यांकडून चावा, तर मोकाट गायीचा हल्ला… राज्यातल्या दोन घटनांनी वाढवली चिंता

August 21, 2026 by admin Leave a Comment


शहरांमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. एका बाजूला भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे मोकाट गायींच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी होत आहेत. कारंजा आणि धुळे इथं समोर आलेल्या दोन घटनांनी हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. कारंजा शहरात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्यानंतर नगरपालिकेनं मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.

कारंज्यात मोकाट कुत्र्यांच्या मोहिमेवरून वाद

याच पार्श्वभूमीवर अकोला इथल्या प्राणीप्रेमी सामाजिक संस्थेशी संबंधित काजल राऊत या पकडण्यात आलेल्या कुत्र्यांची माहिती घेण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागात आल्या होत्या. मात्र, अकोल्याला परत जात असताना सिंधी कॅम्प परिसरात त्यांना दोन व्यक्ती मोटारसायकलवरून एका कुत्र्याला नायलॉनच्या दोरीने बांधून नेताना दिसले. कुत्र्याला अशा पद्धतीने नेलं जात असल्याचं पाहून काजल राऊत संतापल्या. त्यानंतर संबंधित व्यक्तीसोबत त्यांचा वाद झाला. या वादादरम्यान त्यांनी त्या व्यक्तीला चापट मारत शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

धुळ्यात मोकाट गायीचा महिला आणि दोन मुलांवर हल्ला

दुसरीकडे, धुळ्यातील गरुड कॉलनी आणि जयहिंद कॉलनी परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून एका मोकाट गायीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सायंकाळच्या सुमारास गरुड कॉलनीतील साकार ग्लास हाऊसजवळ एक महिला आपल्या दोन मुलांसह स्कूटरवरून घरी जात होती. त्यावेळी मोकाट गायीने त्यांच्या चालत्या स्कूटरला जोरदार धडक दिली. धडकेमुळे महिला आणि दोन्ही मुलं रस्त्यावर कोसळली. त्यानंतर गायीने पाच वर्षांच्या मुलाला शिंगाने उचलून फेकल्याने तो जखमी झाला. महिलेच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे, तर सात वर्षांच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे.

या दोन्ही घटनांमुळे मोकाट कुत्रे आणि जनावरांपासून नागरिकांची सुरक्षा, तसंच त्यांच्यावर नियंत्रण ठेवताना प्राणी कल्याणाच्या नियमांचं पालन करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. प्रशासनाने नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांशी होणारी वागणूक या दोन्ही बाबींचा समतोल राखत ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in