
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेत पेपरफुटीचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांमुळे गेल्या काही काळापासून या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर MPSCच्या अनेक विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. विद्यार्थ्यांकडून सातत्याने आवाज उठवण्यात येत होता. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply