
मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. गेल्या 35 दिवसांपासून पाऊस गायब असल्याने खरीप पिके करपू लागली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला आहे, विभागाची सरासरी केवळ 14.2% नोंदवली गेली आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यावर मोठा परिणाम दिसून येत आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील अनेक प्रमुख धरणांमध्ये 25% हून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सिना-कोळेगाव धरण पूर्णपणे कोरडे पडले असून, तेथे शून्य टक्के पाणीसाठा आहे. बीडमधील मांजरा धरणात 12.26% आणि परभणीतील निम्न दुधना धरणात 22.49% पाणीसाठा आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस न झाल्यास मराठवाड्याला गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला आहे.
Leave a Reply