
उद्धव ठाकरे गटाने धनुष्यबाण हे शिवसेना चिन्ह तात्काळ गोठवण्याची मागणी केली आहे. जर निकालास उशीर होत असेल, तर चिन्हाचा गैरवापर रोखण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटाने या चिन्हाचा दुरुपयोग करून सत्ता मिळवली, असा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला. “आमचा पक्षाचा माल चोरासकट पकडला गेला आहे,” असे म्हणत ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेना स्थापन केली, त्याच काँग्रेसच्या मांडीवर धनुष्यबाण ठेवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले, असे सामंत म्हणाले. आम्ही उठाव करून चार वर्षांपूर्वी तो धनुष्यबाण शिवसेनेच्या पुन्हा ताब्यात आणला, असा दावा शिंदे गटाने केला. वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालते, हे मतदारांनीही सिद्ध केले आहे, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply