
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादार दानवे यांनी जोरदार टीका केली आहे.“धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून तुम्हाला महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिले. मात्र तुम्ही गद्दारी केली. आता मुख्यमंत्र्यांकडे जा आणि जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी करा,” असा थेट हल्लाबोल दानवे यांनी केला आहे.
तसेच, “तुम्ही पक्षाशी गद्दारी केली तेव्हाच शिवसैनिकांनी तुझ्या तोंडाला काळ फासलं पाहिजे होतं, यापुढे भगव्याची आणि बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो, पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला सोडणार नाही,” असा इशाराही दानवे यांनी दिला. दरम्यान, पक्षांतर केलेल्या नेत्यांविरोधात अंबादास दानवे यांनी केलेल्या या आक्रमक वक्तव्याची धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
“धाराशिव जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची आणि पावसाने खंड दिल्यामुळे सुकलेल्या सोयाबीन पिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. यावेळी दानवे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि सत्तेतील आमदारांवर जोरदार टीका केली. दरम्यान, कृत्रिम पाऊस पाडणे हे शक्य नसून ते शक्य असते तर सरकारने दुष्काळावरती खर्च करण्याऐवजी त्यावरतीच खर्च केला असता असेही अंबादास दानवे म्हणाले.
Leave a Reply