
धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या सुमारे एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी हिंमत न हारता शेती कामांना सुरुवात केली आहे. पावसाळ्याचा काळ असूनही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहिरीतील उपलब्ध पाण्यावर कांद्याची लागवड सुरू केली आहे.
सध्या बाजारात कांद्याला ४,००० ते ४,५०० रुपये प्रति क्विंटलच्या पुढे चांगला भाव मिळत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने येत्या काळातही हाच दर टिकून राहावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. कांद्याच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने, चांगला आणि स्थिर भाव मिळाल्यासच कांदा लागवड परवडेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मजुरी, फवारणी, बियाणे आणि इतर अनेक खर्च पाहता, ४,००० रुपयांच्या वर भाव मिळाल्यासच शेतकरी समाधानी राहतील, अशी त्यांची मागणी आहे.
Leave a Reply