
भाजपच्या कार्यकारिणीची पुण्यात आज महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेल संदर्भात मोठं वक्तव्य केलं. “भारत आज पेट्रोल-डिझेलसाठी पूर्णपणे दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. आज आपलं पेट्रोल-डिझेलसाठी अवलंबित्व आहे. मला विश्वास आहे, 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी भागवेल आणि 50 टक्के गरज EV च्या माध्यमातून भागवली जाईल” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. “भारत आत्मनिर्भरतेकडे चालला आहे. आत्मनिर्भरतेकडे जाणारा हा भारत जगातल्या काही शक्तींना आवडत नाहीय. भारताला आज रोखलं नाही, तर यापुढे रोखता येणार नाही. म्हणून त्यांनी कार्यपद्धती बदलली आहे. आज ज्यांचा उपयोग होतोय, त्यांच्यापैकी 5 टक्के लोकांना माहितीय आपला उपयोग होतोय. ते जाणीवपूर्वक अशा शक्तींना साथ देत आहेत” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply