आजकाल भेटवस्तू देण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी कपडे, मिठाई, शोपीस किंवा दागिने भेट देण्याची परंपरा होती, मात्र आता पर्यावरणपूरक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वनस्पती भेट देण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. वाढदिवस, गृहप्रवेश, लग्नसमारंभ, ऑफिस उद्घाटन किंवा इतर शुभ प्रसंगी लोक झाडे आणि शोभेच्या वनस्पती भेट देण्याला प्राधान्य देतात. हरित जीवनशैलीला चालना […]
lifestyle
खजिन्याच्या जागी साप का आढळतात? जाणून घ्या कारण
भारतीय लोककथा, पुराणकथा आणि चित्रपटांमध्ये लपवलेल्या खजिन्याचे रक्षण साप करतात अशी समजूत शतकानुशतके प्रचलित आहे. सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तू जमिनीत पुरल्या गेल्यानंतर त्यांचे रक्षण साप करतात असा अनेकांचा विश्वास आहे. मात्र, वन्यजीव तज्ज्ञ आणि जीवशास्त्रज्ञांच्या मते यामागे कोणतेही गूढ किंवा अलौकिक कारण नसून त्यामागे पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. पूर्वीच्या काळात खजिने बहुतेकदा […]
सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे 5 फायदे, जाणून घ्या तारीख व शुभ वेळ
यंदाची पहिली सोमवती अमावस्या अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी येत आहे. तर वर्षात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये सोमवती अमावस्येला एक विशेष स्थान आहे, कारण या दिवशी स्नान, दान, उपवास आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीला भगवान शिव आणि पार्वती मातेचा आशीर्वाद, शाश्वत सौभाग्याचे वरदान आणि इतर अनेक फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊया की सोमवती अमावस्या […]
लग्नानंतर नेमकं किती वर्षांनी संसार मोडण्याचा धोका सर्वाधिक? विवाहित लोकांनी नक्की वाचा
विवाह हे आयुष्यभराचे आणि सर्वात मजबूत नाते मानले जाते. परंतु, बदलती जीवनशैली, बदलणारे विचार आणि जबाबदाऱ्यांमुळे आजकाल जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात लग्नसंस्थेत लग्न टिकवण्यापेक्षा ते मोडण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. सध्या बहुतांश ठिकाणी घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लग्नानंतरचे कोणते वर्ष नात्यासाठी सर्वात कठीण परीक्षा पाहणारे ठरते, याबद्दल […]
‘या’ लाल फळाचे रोज एक कप ज्यूस प्यायल्याने त्वचा होईल गुलाबी, जाणून घ्या त्याचे फायदे
आपल्यापैकी अनेक महिला त्वचेची चमक वाढवण्यासाठी दर महिन्याला हजारो रूपये खर्च करून फेशियल करतात. पण कालांतराने याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो आणि त्वचेचे नुकसान होते. तर कधीकधी सुंदर त्वचेचे रहस्य महागड्या उत्पादनांमध्ये नसून तुमच्या आहारात दडलेले आहे. अशावेळेस आपला आहारा देखील निरोगी ठेवणे तितकाचं महत्वाचं आहे. तर चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी डाळिंबाच्या ज्यूसचे सेवन फायदेशीर ठरते. […]
पावसाळ्याच्या दिवसात खूपच मनमोहक दिसतात तेलंगणातील ही 5 ठिकाणं, नक्की करा एक्सप्लोर
तेलंगणा राज्य आपल्या संस्कृती आणि सुंदर ठिकाणांसाठी ओळखला जातो. त्यातच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील सौंदर्य शिगेला पोहोचते. त्यामुळे तुम्ही जर पावसाळी ट्रिप प्लॅन करत असाल, तर तुम्ही तुमच्या फिरण्याच्या लीस्टमध्ये तेलंगणाचा समावेश करू शकता. पावसाळ्यात येथील डोंगर, धबधबे आणि हिरवळ स्वर्गासारखं वाटते. पावसाळ्याच्या आगमनाने तेलंगणातील अनेक पर्यटन स्थळे एका नव्या तेजाने उजळून निघतात. ढगांनी वेढलेली दरी, […]