गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी एक दुर्देवी घटना घडली . धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे एका आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. विद्यार्थींनी रात्री झोपेत असताना ही घटना घडली. त्यावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज बोलले. “तीन मुली दगावल्या आहेत. तीन मुलींवर उपचार सुरु आहेत. अनुदानित शाळेची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल” असं […]
Latest News
निवडणूक आयोगाला शिवसेना या मुद्द्यावर उघडं पाडणार, असीम सरोदेंचा दावा
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची 2018ची घटना आमच्याकडे नाहीये, असं म्हटलं आहे. मात्र, त्यांनीच दिलेल्या निर्णयाच्या एका परिच्छेदात शिवसेना पक्षाचे सर्व डिटेल्स शिवसेनेच्या 2018च्या घटनेनुसार तपासले असल्याचं म्हटलं आहे. यावरून निवडणूक आयोग सपशेल खोटं बोलून दिशाभूल करत असल्याने आज निवडणूक आयोगाचा हाच खोटारडेपणा आम्ही सर्वोच्च न्यायालयात उघडा पाडणार आहोत, असं प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी म्हटलं […]
Vastu Tips : पावसाचं पाणीही बदलू शकतं तुमचं नशीब… धन, संपत्ती आणि आरोग्यावर होईल कृपा; असा करा अचूक उपाय
श्रावण महिन्यात पावसाची संततधार सुरू असते. पावसामुळे वातावरण आल्हाददायक होतं, कोरड्या जमिनीला नवसंजीवनी मिळते आणि सर्वत्र हिरवाई पसरते. मात्र, पावसाचे हे पाणी केवळ निसर्गासाठीच नव्हे, तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अनेक उपायांसाठीही महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात स्वच्छ पावसाच्या पाण्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, पावसाचे पाणी योग्य पद्धतीने साठवून काही सोपे उपाय […]
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
आश्रमशाळेतील विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना केवळ अपघात नसून, “निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून आहे,” असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनेबाबत खंत व्यक्त केली. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी […]
मण्यार जातीचा साप, खिडकीतून खोलीत एन्ट्री, मुलींच्या पायाला…; राज्यमंत्र्यांनी सांगितला आश्रमातील थरारक प्रसंग
गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदिवासी आश्रमशाळेतील तीन मुलींच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या तिन्ही मुलींना मण्यार जातीचा सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. या थरारक घटनेचा प्रसंग राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. तसेच या घटनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती दिल्याचं राज्यमंत्री जायस्वाल […]
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त…
मुंबईत बॅचलर्सना घर भाड्याने देण्यास नकार दिला जात असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मराठी अभिनेत्री सारिका साळुंखे हिने अंधेरी लोखंडवाला परिसरातील घरांच्या भाड्याबाबत आणि बॅचलर्सना येणाऱ्या अडचणींबाबत सोशल मीडिया पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे. सारिका साळुंखे हिने पोस्टमध्ये, “आम्हाला ही फॅमिली सोबत राहायला आवडेल, मात्र, आम्ही मराठी कलाकार बॅचरल म्हणून आम्हाला घर नाकारले जाते,” […]