राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासासाठी रेड अलर्ट जारी केला. मुंबईमधील अनेक भागात पाणी साचले आहे. यासोबतच रेल्वे वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला. पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोळंबा झाला. मोठ्या दरड कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे रूळावर दरड कोसळल्या आहेत. काही रेल्वेंच्या मार्गात […]
india
ऐन पावसात निवडणुकीचा ‘धुरळा’ उडणार; कोणत्या 3 जागांवर पोटनिवडणुका होणार? अधिकृत माहिती समोर
देशातील काही भागात जोरदार पाऊस सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुखेंदु शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बडाईक यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तीन राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार असून निवडणूक आयोगाकडून त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात […]
अपघातग्रस्तांना मदतीचा हात, यूएईच्या उद्योगपतीने दिले 2.6 कोटी, पीडित कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू
यूएईमध्ये स्थायिक भारतीय उद्योजक डॉ. शमशीर वायलील यांनी दुबईच्या एमिरेट्स रोड अपघातामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांसाठी जाहीर केलेली ₹2.6 कोटींची मानवतावादी मदत तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील मृत भारतीय कामगारांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचली आहे. या अपघातात सात कामगारांचा मृत्यू झाला होता. डॉ. शमशीर यांच्या कार्यालयातील प्रतिनिधींनी अपघातात प्राण गमावलेल्या सहा भारतीय कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी तेलंगणा आणि […]
बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना झाली तर…मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये, कोण असणार जबाबदार? मार्गदर्शक सूचना जारी
मुंबईत गेल्या तीन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तीन दिवसांपासून मुंबईत अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तर मानखुर्दमध्ये घरे पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बांधकामांच्या ठिकाणीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली आहे. महापालिकेने बिल्डर, कंत्राटदारांसाठी मार्गदर्शक सूचना […]
Mumbai Rain News Updates : कर्मचाऱ्यांना दुपारनंतर सुट्टी, खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश; सरकारचा मोठा निर्णय
राज्यभरात वरूणराजाने चांगलाच जोर धरला असून सर्वत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. तीन दिवसांपासून अविरत पडणाऱ्या पावसाने अनेक धरणं, तलाभ भरून वाहू लागले आहेत, तसेच काही नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही भागांत रस्ते टखचले, मिसिंग लिंक तसेच मुंबई-पुणे मार्गावर सततच्या पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूकही ठप्प झाली. रेल्वे मार्ग, रस्ते वाहतूक मार्ग बंद असल्याने […]
Indrayani River | आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना प्रशासनाचा तातडीचा इशारा
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले असतानाच मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीपात्रातून सध्या शंभर टक्के विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने वारकऱ्यांना आणि नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे तसेच पाण्यात उतरू नये, असे आवाहन केले आहे. पावसामुळे नदीचा प्रवाह वेगवान झाला असून पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना […]