आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे भारतात आणि महाराष्ट्रात त्याचे परिणाम जाणवत आहेत. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात असलेल्या नऊ ऑटो एलपीजी पंपांपैकी सात पंपांवरील गॅस संपल्याची माहिती आहे. उपलब्ध असलेल्या पंपांवर गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या तीन ते चार […]
india
Oil Crisis : बांग्लादेश शत्रू सारखा वागूनही तेल संकटाच्या काळात भारताने त्यांच्यासाठी घेतला एक मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे जगात तेल संकट निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे. इराणकडून आखाती देशांमधील तेल डेपोंवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळे काही देशांनी आपले तेल प्रकल्प बंद केलेत. त्यामुळे ऊर्जेचा पुरवठा बाधित झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक देश आपल्याकडे तेलाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून […]
Devendra Fadnavis | आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार, कायद्यात तरतूद करण्यासाठी समिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत राहुल कुल यांच्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान सोशल मीडिया आणि बदनामीच्या वाढत्या समस्येवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे, विशेषतः महिलांना याचा त्रास जास्त सहन करावा लागतो.” यासंदर्भात कायद्यात […]
Pune Junner | इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका; काय आहे संकट?
सध्या सुरू असलेल्या इराण- इस्त्रायल युद्धामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत असून त्याचा फटका भारतातील साखर उद्योगालाही बसताना दिसत आहे. युद्धजन्य परिस्थिती सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने साखर कारखान्यांना निर्यातीसाठी दिलेल्या कोट्यानुसार होणारी साखर निर्यात ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून निर्यात होणारी साखर अनेक बंदरांवर अडकून पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. युद्धामुळे समुद्री […]
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; आंतरराष्ट्रीय युद्धाचे थेट परिणाम
आंतरराष्ट्रीय युद्धाचे थेट परिणाम आता मुंबईवरही जाणवू लागले आहेत. इराण, इजराईल आणि अमेरिकेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीत मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. यामुळे मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा जाणवत असून, हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना मोठा फटका बसत आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये 19 किलो आणि 5 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा […]
इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतातील साखर ‘कडू’; गुढीपाडव्याला साखर गाठी महाग? काय स्वस्त आणि कोणत्या वस्तू महागल्या?
Sugar Price Hike: आखातातील युद्धामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. साखर कारखान्यांसह शेतकर्यांना युद्धाचा मोठा फटका बसला आहे. तर भाजीपाला स्वस्त झाला. बाजारात केळीचे भाव पण उतरण्याची शक्यता आहे. त्याचवेळी नवीन वर्षाला, गुढी पाडव्याला साखर गाठींचे भाव, साखर कडे महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराण-इस्त्रायल युद्धामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ […]