• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत

August 30, 2026 by admin Leave a Comment


सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरूच आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. शिवसेना कुणाची, यावरून सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रक्षा बंधनाच्या दिवशी मुंबईत आले होते. मुंबईत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संवादावरून उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली. सुप्रीम कोर्टातील आगामी निकालामुळे शिंदे गटात खळबळ असून सर्व मंत्री आणि आमदार घाबरले असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर टीका 

खासदार संजय राऊत यांनी अमित शहा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शिंदेंनी अमित शहांना सांगितलं की, साहेब, आमचे आमदार आणि मंत्री फार घाबरले आहेत. सर्व जण धक्क्यात आहेत. त्यांचे साहेब म्हणाले, काय झालं? त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून अस्वस्थ आहेत’. त्यावर अमित शहा म्हणाले, ‘मी आहे, टेन्शन घेऊ नका’. गेल्या महिन्यात संसदेचं अधिवेशन सुरू असताना गद्दार खासदार हे शिंदे पुत्रांसोबत अमित शहांना भेटले. तेव्हाही दोन खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी देखील अमित शहा यांनी सर्व काही ठिक होईल, असे सांगितले. त्याची चिंता करू नका. सर्व माझ्यावर सोपवा’. देशाचं सुप्रीम कोर्ट यांच्या खिशात आहे का? उघडपणे सुप्रीम कोर्टावर भाष्य केले जात आहे. अशामुळे देशावरील न्यायव्यवस्थेचा विश्वास नष्ट होतो’.

‘अमित शहा मुंबईत येतात किंवा दिल्लीत बसतात. त्यावेळी गद्दार जाऊन भेटतात. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चिंता करू नका, असं म्हणतात. फडणवीसही तसंच म्हणतात. राहुल नार्वेकरही सांगतात, मी जे सांगितलं, तोच निकाल. एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री तेच सांगत आहे. आता न्यायालयांना कळवणं, हेच आमचं कर्तव्य आहे, असे राऊतांनी पुढे सांगितले.

सत्याचा विजय होईल – संजय राऊत

संजय राऊत यांनी आमचा न्यायालय आणि संविधानावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. सत्य आणि धर्माचा विजय होणार असून न्यायव्यवस्था ही अधर्माच्या बाजूने जाणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. बुडत्याचा पाय खोलात, असं काल त्यांच्याबाबतीत झाल्याची टीका राऊतांनी केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार.. जरांगेंचा इशारा, संजय जाधव यांना औदसा आठवली म्हणत..
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर बंडू जाधव यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले…
  • Mann Ki Baat: ‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
  • उपमुख्यमंत्री शिंदे मराठवड्यात, मनोज जरांगेंच्या धमकीनंतर परभणी दौरा चर्चेत; पुढील 3 तासांत कुठे-कुठे जाणार? महत्त्वाची समोर
  • IND vs PAK: Asia Cupच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात, भारतविरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये हँडशेक होणार की नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in