• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mann Ki Baat: ‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य

August 30, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी, 30 ऑगस्ट 2026) ‘मन की बात’च्या 137व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. सकाळी 11 वाजता प्रसारित झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी देशातील विविध सामाजिक उपक्रम, युवक, राष्ट्रभक्ती, इतिहास आणि नशामुक्ती यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केलं. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ या अभियानाचा विशेष उल्लेख केला. हे अभियान देशभर वेगाने पुढे जात असून, मोठ्या संख्येने तरुण त्याच्याशी जोडले जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

नशेची सवय केवळ संबंधित व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजावर होतो, असं मोदी म्हणाले. ड्रग्सविरोधात जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाधीन व्यक्तींना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांचं त्यांनी कौतुक केलं. तरुणांनी ड्रग्सविरोधी संदेश देणारी गाणी, नाटकं आणि इतर सर्जनशील उपक्रम राबवावेत, असं आवाहनही त्यांनी केलं.

पंतप्रधान मोदी यांनी तरुणांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांनी नव्या कल्पना, कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावं, असं त्यांनी सांगितलं. नशामुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केवळ सरकारच नव्हे, तर प्रत्येक कुटुंब आणि समाजाने पुढाकार घेणं आवश्यक आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलं.

‘सूर्यपथ तिरंगा’चा उल्लेख

ऑगस्ट महिन्यात देशभर दिसणाऱ्या राष्ट्रभक्तीच्या वातावरणाचा उल्लेख करताना मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची चर्चा केली. यंदा 8 कोटींपेक्षा जास्त तिरंगा सेल्फी अपलोड झाल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच ‘सूर्यपथ तिरंगा’ या अनोख्या उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. या माध्यमातून तिरंगा जगभराच्या प्रवासावर निघाला असून, फिजीची राजधानी सुवामध्ये सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.

इतिहास जाणून घेण्यासाठी खास वेबसाइट

‘मन की बात’मध्ये मोदींनी भारताच्या इतिहासाशी संबंधित एका अनोख्या वेबसाइटचाही उल्लेख केला. मुंबईतील कृष्णा शेषाद्री यांनी तयार केलेल्या bharatrajya.com या वेबसाइटवर एखादं वर्ष निवडल्यानंतर त्या काळात भारताच्या कोणत्या भागावर कोणाचं राज्य होतं, याची माहिती मिळते, असं त्यांनी सांगितलं. इतिहास अधिक रंजक पद्धतीने समजून घेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचं मोदी म्हणाले.

‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदी यांनी युवकांना नशेपासून दूर ठेवणं, राष्ट्रभावना मजबूत करणं आणि देशाच्या इतिहासाबद्दल उत्सुकता निर्माण करणं यावर विशेष भर दिला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?
  • खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
  • ‘फँड्री’मधील शालूच्या हॉट लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, हिरव्या साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज, फोटो चर्चेत
  • Girija Oak: नॅशनल क्रश म्हणतात ते उगाच नाही..; गिरीजा ओकचा नवीन लूक पाहून चाहते घायाळ
  • Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in