
राज्यात हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. पावसाची वाट शेतकरी बघत आहेत. राज्यात अजूनही समाधानकारक पाऊल झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. सप्टेंबर महिन्यात भारतीय हवामान विभागाने अगोदरच मोठा इशारा दिला. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. पहिला आठवडा तर कोरडा गेला. त्यातच आता भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. एल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा होता. त्यातच आता मोठा इशारा देण्यात आला. पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस.डी सानप यांनी मोठे विधान पावसाबद्दल केले. एल ननोचा वाढता प्रभाव असला तरीही परतीच्या पावसात तूट भरून निघेल, असे त्यांनी म्हटले.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता नसेल असे मोठे विधान एस.डी सानप यांनी स्पष्ट केले. राज्याच्या अनेक भागात पावसाचे मोठे संकट आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. पण पाऊस पडताना दिसत नाही. दुष्काळाचे मोठे संकट आहे. त्यातच राज्यात पुढील काही दिवस पाऊस नसणार आहे. राज्यात मान्सूनचे वारे कमकुवत झाले असून हवेतील आद्रतेचे प्रमाण कमी झालंय.
राज्यावर कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या बहुतांश भागात हवामान देखील कोरडे राहणार असून एल निनोच्या वाढत्या प्रभाव असला तरी परतीच्या पावसात तूट भरून निघेल असा अंदाज भारतीय हवामान पुणे विभागाने वर्तविला आहे.
यावेळी भारतीय हवामान पुणे विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. काही जिल्हामध्ये परिस्थिती अशी आहे की, धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली. स्थिती गंभीर असून मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यातच मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.
Leave a Reply