• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताकडे ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद, अन् होणारी संभाव्य वाहतूक कोंडी

September 10, 2026 by admin Leave a Comment


भारत ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहे, मात्र हे यजमानपद भूषवत असताना  वाहतुकीत व्यत्यय तसेच वाहतूक कोंडीबाबतच्या समस्या निर्माण होऊ शकतात.  मात्र, या व्यत्ययांकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. भारत ब्रिक्सच्या 11 सदस्य देशांच्या आणि 10 भागीदार राष्ट्रांच्या नेत्यांचे, तसेच इतर निमंत्रित शिष्टमंडळांचे यजमानपद भूषवत आहे. प्रत्येक नेता केवळ एकदाच प्रवास करत नाही. शिखर परिषदेच्या सामान्य वेळापत्रकानुसार, एका दिवसात दोन किंवा तीन वेळा प्रवासाची शक्यता असते. यामध्ये विमानतळावरून हॉटेलकडे, हॉटेलवरून परिषदेच्या स्थळाकडे आणि त्यानंतर द्विपक्षीय बैठका, अधिकृत कार्यक्रम किंवा इतर भेटीगाठींसाठी होणारा नेत्यांच्या प्रवासाचा समावेश आहे.

त्यामुळे, वरवर पहाता हा केवळ काही मोजक्या व्हीआयपी लोकांचा प्रवास वाटू शकतो. परंतु ब्रिक्स शिखर परिषदेचं व्यापक स्वरुप लक्षात घेता, एका दिवसामध्ये अशा प्रकारच्या 70 ते 80 व्हीआयपी फेऱ्यांची शक्यता आहे. या प्रत्येक नेत्यांसाठी  स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था करावी लागते, ज्यामध्ये वाहतूक नियंत्रण, प्रवेशावर निर्बंध आणि मार्गांचे समन्वय यांचा समावेश असतो. म्हणूनच, सामान्य ‘व्हीआयपी’ दौऱ्याच्या तुलनेत वाहतुकीवर होणारा परिणाम येथे अधिक तीव्र असतो.

तसेच, ही परिषद अशा वेळी होत आहे जेव्हा जागतिक स्तरावर सुरक्षेचे धोके वाढले आहेत आणि अनेक प्रदेशांमध्ये युद्धे व भू-राजकीय तणाव निर्माण झाले आहेत. हे नेते भारताचे पाहुणे आहेत आणि यजमान देश म्हणून, अशा महत्त्वाच्या बैठकीसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या सुरक्षेतच त्यांची ने-आण होईल, याची हमी भारताने दिली आहे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी भारतावर आहे.

वाहतुकीतील असे व्यत्यय केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत; कारण जेव्हा जगातील प्रमुख राजधान्यांमध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा आयोजित केल्या जातात, तेव्हा तात्पुरते वाहतूक निर्बंध, सुरक्षित मार्ग (secure corridors) आणि प्रवेश नियंत्रण या गोष्टी नेहमीच्याच असतात.

भारताचे भू-राजकीय आणि आर्थिक महत्त्व जसजसे वाढत जाईल, तसतसे जागतिक शिखर परिषदा, धोरणात्मक चर्चा आणि उच्च-स्तरीय राजनैतिक भेटीगाठींसाठी भारत स्वाभाविकपणे एक महत्त्वाचे केंद्र बनेल. जागतिक  नेते भारतात येतील, येथे अधिक आंतरराष्ट्रीय चर्चांचे आयोजन केले जाईल आणि दिल्ली जागतिक मुत्सद्देगिरीच्या प्रमुख राजधानींपैकी एक म्हणून  महत्त्वाची भूमिका बजावेल



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करत असतो – देवेंद्र फडणवीस
  • 80s रेट्रो ट्रेंड झाला जुना, आता AI ने फोटोला राजस्थानी शाही घराण्याचा लुक्स द्या, या 5 Prompts मदतीने तुमचे रुप बदला…
  • Modi-Putin Meet 2026 : पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना 2000 वर्षापूर्वीच पुस्तक गिफ्ट केलं, त्यात काय खास आहे?
  • Elena Rybakina : टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची जगभर चर्चा
  • BRICS Summit : भारताचा अमेरिकेला मोठा धक्का, ब्रिक्स परिषदेमधील हा फोटो पाहिलात का? ट्रम्प यांचा होणार जळफळाट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in