• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पेपरफुटी प्रकरणात संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट; भाजपवर काय केले आरोप?

September 8, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे. गेल्या 10 वर्षापासून राज्यात फडणवीस यांचं राज्य आहे. मग तुम्हाला टास्क फोर्स नेमण्याची गरज का पडली? राज्यात पोलीस नाहीये का? एका यंत्रणेवर दुसरी यंत्रणा का लादली जात आहे? असा सवाल करतानाच पेपरफुटी प्रकरणात भाजपशी संबंधित लोकच अधिक असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे.

राज्य सरकारला टास्क फोर्स नेमण्याची गरज का आली? गेल्या 10 वर्षापासून फडणवीस यांचं एक छत्री राज्य आहे. तरीही राज्यात मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे पेपर फुटीचे प्रकरणं होत आहे. नीट असो किंवा एमपीएससी असो या सर्व पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये भाजपचे कार्यकर्ते अडकलेले आहेत. यूपीएससी प्रकरणात पुणे आणि लातूरातून जे आरोपी पकडले ते भाजपशी संबंधित आहेत. आता टास्क फोर्स नेमली आहे. काय करणार आहे ही टास्क फोर्स? ही टास्क फोर्स जिल्ह्या जिल्ह्यात फिरणार. जिल्ह्या जिल्ह्यात पोलीस नाही? जिल्ह्या जिल्ह्यात सरकारी यंत्रणा नाही? एका यंत्रणेवर दुसरी यंत्रणा नेमत आहात. यापूर्वी कोणत्याही टास्क फोर्स शिवाय लोकसेवा आयोगाची पेपर सेटिंग आणि भरती प्रक्रिया चालायची. तेव्हा काही घडलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.

ही वेळ भाजपने आणली

अयोध्येतील दानपेटी ऑनलाईन दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरूनही राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. अयोध्येत प्रभू रामाच्या मंदिरात दानपेटीत ऑनलाईन का दाखवली जाणार आहे? ही वेळ भाजपने आणली. त्यांच्या राज्यात लूट झाली. आता एअर मार्शलला आणून सीईओ बनवावं लागलं. पूर्वी पुजारी मंदिराची व्यवस्था पाहायचा. आता ए्अरमार्शलला बसवलं आहे. राम मंदिराला यांनी सोडलं नाही. ते मुलांना काय सोडणार? असा हल्ला राऊत यांनी चढवला.

आता ममता बॅनर्जींचं सरकार नाही ना?

पश्चिम बंगालमध्ये डीजे बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र तसा निर्णय घेण्यात आलेला नाही. याकडेही राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. दोन्ही राज्यात भाजपचं सरकार आहे. ममता बॅनर्जींचं सरकार नाहीये ना? ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला असता तर भाजपने त्याला कडाडून विरोध केला असता. हिंदूंच्या सणांना विरोध केला म्हणून आकांडतांडव केलं असतं, असा टोला त्यांनी लगावला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात
  • Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर…
  • श्रीमंत लोक उलट्या गोष्टी करतात… उगाचच श्रीमंत होत नाहीत? त्यांच्या या 5 ट्रिक्स माहीत आहेत का?
  • Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ
  • हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, भारत-पाकिस्तानमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in