
भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री काही नवी नाही. ज्या ज्यावेळी भारताला मदतीची गरज पडली, त्या प्रत्येकवेळी भारताच्या मदतीला धावून रशिया आला. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाची मोठी समस्या होती. त्यावेळी भारताच्या मदतीला धावून रशिया आला. भारताला हवे तेवढे कच्चे तेल आम्ही देणार असल्याचे रशियाने जाहीर केले. भारत हा रशियाकडून कच्चे तेल घेत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. नवी दिल्लीत 12 ते 13 सप्टेंबर दरम्यान 18 ब्रिक्स शिखर समेंलनाचे आयोजन केले जाणार आहे. त्याच्या बरोबर अगोदर 11 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या उच्चस्तरीय व्दिपक्षीय संवाद होईल. क्रेमलिन प्रवक्ते दमित्री पेसकोव यांनी म्हटले की, भारतासोबतचे संबंध आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत.
पेसकोव यांनी म्हटले की, भारत आणि रशिया यांच्यात मोठा व्यापार आहे. सुरक्षा, ऊर्जा, परिवहन आणि विज्ञान या क्षेत्रात दोन्ही देशांना काम करायचे आहे. दोन्ही नेते सतत एकमेकांच्या संपर्कात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आणि पुतिन यांच्या बैठकीत व्दिपक्षीय संबंधांवर चर्चा होईल. भारतीय कंपन्यांना भारतात गुंतवणूक करायची आहे.
त्यांना रशियाच्या मार्केटमध्ये रस आहे. भारतीय बाजारात उत्पादन वाढवण्यासाठी अनेक रशियन कंपन्या इच्छुक आहेत. काही महिन्यांपूर्वीच पुतिन हे भारत दाैऱ्यावर आले होते. भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावल्यानंतर तब्बल सात मंत्र्यांना आपल्यासोबत घेऊन पुतिन भारत दाैऱ्यावर आले होते. यादरम्यान काही अत्यंत महत्वाचे करारही पुतिन यांनी केले. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर रशियाची बाजारपेठ खुली केली.
अनेक महत्वपूर्ण करार केले. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेने काही निर्बंध रशियावर लादली. रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशावरही कारवाई अमेरिकेकडून करण्यात आली. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर टॅरिफ अमेरिकेने लादला. त्यावेळी पुतिन भारताचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुढे आले. भारतासोबत त्यांनी मोठे करार केले.
Leave a Reply