
पुण्यात डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना दिवसेंदिवस जनसमर्थन वाढत चाललं आहे. त्याचवेळी त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्याही कमी नाहीय. हिंदुत्ववादी विचारसरणीचे किर्तनकार संग्राम भंडारे यांनी विद्यानंद बापट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “विद्यानंद बापट कोणाला माहित नव्हते, तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी डिजे विरोधात भूमिका घेतलेली. बापट आधी डिजे, लेझरला विरोध करतात, मग ढोल ताशाला, त्यानंतर मिरवणूक या रस्त्यावरुन नको त्या रस्त्यावरुन न्या असं बापट म्हणतात” अशी टीका संग्राम भंडारे यांनी केली.
“काल परवा आलेले हा विद्यानंद बापट, डीजेच्या माध्यमातून आला. मी डीजेला विरोध करतोय, मी लेझर लाइटला विरोध करतोय. नंतर-नंतर ते वळणाचं पाणी वळणाला गेलं. ते नंतर म्हणायला लागलं ढोल-ताशा नको, लेझीम नको. ढोल-ताशाला विरोध करणारा भारतीय कसा असू शकतो?” असा सवाल संग्राम भंडारे यांनी विचारला. “तो महाराष्ट्रीय कसा असू शकतो? मिरवणुकीचे रस्ते बदला, हा बाप झालाय का?” अशा शब्दात संग्राम भंडारे यांनी विद्यानंद बापटवर हल्लाबोल केला.
डीजेच्या मुद्यावर दोन गट
याच आठवड्यात विद्यानंद बापट टीव्ही 9 मराठीच्या शो मध्ये बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर डीजे विरोधातील सूर अधिक बळकट झाला. गणेशोत्सव जवळ येत असताना डीजेचा मुद्दा राज्यात मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. नागपूर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई इथे भव्य गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका निघतात. त्यावेळी डीजे वाजवला जातो. आता डीजेच्या मुद्यावर राज्यात दोन गट पडले आहेत. कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी, लोकसहभागातून लोकांना विश्वासात घेऊन डीजेच्या मुद्यावर तोडगा काढावा अशी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भूमिका आहे.
चांदीचे कडं देऊन सन्मानित करणार
संग्राम भंडारे यांनी यापूर्वी सुद्धा विद्यानंद बापटच्या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणला चांदीचे कडं देऊन सन्मानित करणार असल्याची घोषणा संग्राम भंडारे यांनी केली आहे. विद्यानंद बापट फक्त डीजे विरोधामुळेच नव्हे, तर त्याच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे सुद्धा चर्चेत आहेत.
Leave a Reply