• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Twinkle Khanna : पुस्तकातील मुघलांना हटवण्यापेक्षा जेवणातील कबाब हटवा; ट्विंकल खन्नाच्या पोस्टमुळे नवा वाद

September 7, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने केलेल्या एका पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ट्विंकलने ‘मिसेस फनीबोन्स’ या तिच्या कॉलममध्ये अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविषयी वक्तव्य केले आहे. ट्विंकलने या कॉलमध्ये मुघलांचा इतिहास पुस्तकातून हटवण्यापेक्षा जेवणातील कबाब हटवा असे विधान केले आहे. तिच्या या विधानाने नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

काय म्हणाली ट्विंकल खन्ना?

खरे तर ट्विंकल खन्नाने तिच्या कॉलममध्ये मुघल साम्राज्याबाबत लिहिले होते की, जे लोक आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमधून मुघलांना हटवू टाकू इच्छितात, त्यांनी सर्वप्रथम त्याची सुरुवात लंचपासून करावी. आधी कोफ्ते, कोरमा, कबाब यांचा त्याग करावा… तुम्ही खरे आहात की खोटे, मुघलाई पनीरही ठेवू शकत नाही आणि ते खाऊही शकत नाही. सोशल मीडियावर ट्विंकल खन्नाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ट्विंकलच्या या विधानाने इंटरनेटवरील एका कंटेंट क्रिएटर शीमा खेर यांना राग अनावर झाल आहे. केवळ शीमाच नव्हे तर अनेक इतर युजर्सनीही अभिनेत्रीच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

शीमा यांनी ट्विंकल खन्नावर टीका केल्याचे दिसत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जेवणाची तुलना हिंसक इतिहासाशी करणे हे ना मजेदार आहे ना शहाणपणाचे. पुढे त्यांनी ‘केसरी’ या चित्रपटाचे उदाहरण दिले. हा चित्रपट ट्विंकलचा पती अक्षय कुमारनेच केला आहे.

इंटरनेटवर प्रश्न उपस्थित होत आहेत

शीमा म्हणाल्या की, सारागढीच्या लढाईसारख्या ऐतिहासिक घटना शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट नसल्याने ‘केसरी’सारखे चित्रपट बनवले गेले. तिने मिश्किलपणे म्हटले की, जर ट्विंकलला चित्रपट पाहिल्यानंतर त्या काळातील हिंसाचार समजला आणि तो तिला आवडला, तर याचा अर्थ असा नाही की ती त्यानंतर चिकन किंवा इतर पदार्थ खाणे सोडून देईल.

त्या ट्विंकलला प्रश्न विचारतात की, जर आपण इतिहासातील हिंसा आणि संघर्षावर आधारित चित्रपट पाहू शकतो, तर शहीदांच्या पराक्रमाचा स्वीकार करू शकतो आणि तरीही जेवण खाऊ शकतो. इतिहासाच्या चर्चेत अचानक जेवणाचा वापर युक्तिवाद म्हणून का केला जात आहे? शेवटी शीमा म्हणाल्या की, मुघल भारतात फक्त कबाब आणि कोरमासारख्या गोष्टी देण्यासाठी आले नव्हते. त्यांच्या काळात युद्धे, विजय आणि रक्तपातही झाला होता. त्यामुळे इतिहासाला फक्त जेवणाच्या दृष्टिकोनातून पाहू नये.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अंबानी कुटुंबाचा विषय खोल, या व्यक्तीकडे 1700 हिऱ्यांचे घड्याळ, किंमत वाचून चकित व्हाल
  • Vastu Tips : बेडखाली या वस्तू नकोच..कमी होऊ शकते घरातली सुख शांती; काय सांगतं वास्तूशास्त्र ?
  • अर्धा भारत नेस्तनाबूत… पाकिस्तानचा महाभयंकर व्हिडीओ, बघताच क्षणी… नेटकऱ्यांनी केली धुलाई
  • इराणसोबत युद्ध सुरू असतानाच मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धोक्याची घंटा, अमेरिकेत मोठी खळबळ
  • मुलीचा जन्म झाला की हे गाणं प्रत्येक घरात वाजतं, 50 वर्षांपासून सुपरहिट, लता मंगेशकरांच्या आवाजमुळे आजही…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in