
महाराष्ट्रात आता अन्नभेसळ करणाऱ्या अन्न उत्पादक कंपन्यांनवर धाडधाड कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून या पदाचा कार्यभार हाती घेतला आहे तेव्हापासून भेसळ करणाऱ्या लोकांची थेट परवाने रद्द केल्याचे प्रकार समोर आले आहेत.
भेसळयुक्त अन्न आणि औषधांवर कारवाईचा सध्या सुरु आहे. अन्न व औषध प्रशासनापुढे निकृष्ट सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई करायचे की नाही असा प्रश्न एफडीए समोर कायम आहे. सौंदर्यप्रसाधन वस्तूंवर कारवाई होणं अवघड आहे.
औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ अंतर्गत सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांसाठी परवान्याची गरज आहे पण विक्रीसाठी मात्र गरज नाही. त्यामुळे विक्री होणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांना कायद्याने कोणतीही आडकाठी करण्यात आलेली नाही.
जोपर्यंत केंद्राकडून या उत्पादनांच्या विक्रीसाठीही निश्चित आणि कठोर नियमावली तयार करण्यात येत नाही तोपर्यंत एफडीएकडून कठोर कारवाई केली जाणार नाही. “औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ अंतर्गत सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी थेट परवान्याची गरज नाही. तक्रारींची शहानिशा करून बनावट सौंदर्यप्रसाधनांवर ताबडतोब करावाई केली जाईल. सर्वसामान्यांनी पुढाकार घ्यावा आणि यासंदर्भातील माहिती कळायला हवं” असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.
काही वर्षांपूर्वी राज्यामध्ये या उत्पादनांच्या विक्रीसाठीही परवाना सक्त करावा, यासाठी तत्कालीन आयुक्तांनी पाठपुरावा सुरू केला. छोट्या दुकानांपासून औषधांच्या दुकानापर्यंत, रस्त्यावरही ही सौंदर्यप्रसाधने सर्रास विकली जात आहे. एफडीएकडे आधीच मनुष्यबळ कमी आहे त्यात आणखी कामाचा भार वाढेल असे त्यांचे म्हणणे आहे.




Leave a Reply