• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PoK मध्ये रक्तरंजित संघर्ष! यासीन मलिकच्या पत्नीने भारतीय सैन्याची मदत मागितली का?

August 3, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईबाबत सोशल मीडियावर अनेक दावे व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक दावा असा करण्यात आला की, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे नेते यासीन मलिक यांची पत्नी मुशाल मलिक यांनी पीओकेतील नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. मात्र उपलब्ध माहितीनुसार हा दावा दिशाभूल करणारा असून त्याला कोणताही विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील ‘सबा कौल’ नावाच्या अकाउंटवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की, भारताविरोधात अनेक वर्षे प्रचार करणाऱ्या आणि यासीन मलिक यांच्या सुटकेसाठी मोहिम राबवणाऱ्या मुशाल मलिक यांनी आता पीओकेतील संकट संपवण्यासाठी भारतीय लष्कराकडे मदतीची मागणी केली आहे. या पोस्टमध्ये यासीन मलिक यांच्यावर दहशतवादासाठी निधी उभारणीच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्याचा उल्लेख करत हा कथित बदल आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.

मात्र या दाव्याची पडताळणी केली असता, मुशाल मलिक यांनी भारतीय लष्कराच्या हस्तक्षेपाची मागणी केल्याचे कोणतेही अधिकृत विधान किंवा विश्वासार्ह पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, पीओकेमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईवर अनेक स्तरांतून टीका होत आहे. काही पाकिस्तानी नागरिकांनी आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनीही या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले असून, काहींना त्यासाठी नोकरी गमवावी लागल्याचेही वृत्त आहे. मात्र काश्मीरमधील प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या मुशाल मलिक यांनी पाकिस्तानी लष्कर किंवा सरकारवर थेट टीका केलेली नाही अशीही चर्चा सुरू आहे.

Mushaal Malik, the wife of jailed JKLF chief Yasin Malik, has spent years campaigning against India and demanding her husband’s release. Yasin Malik is serving a life sentence in India after his conviction in a terror-funding case. That is why her reported appeal asking the… pic.twitter.com/SY8JRFqrvC

— Saba kaul.🇮🇳 (@sabakaul1) August 2, 2026

शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन

याउलट, मुशाल मलिक यांनी पाकिस्तान सरकार आणि जॉइंट अवामी अॅक्शन कमिटी यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी सुरू असलेला तणाव संवादातून सोडवण्याचे आवाहन केले असून, शांततापूर्ण चर्चाच हा एकमेव मार्ग असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला, ज्यामध्ये फील्ड मार्शल असीम मुनीर यांचाही समावेश आहे, परिस्थितीत हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

विशेष म्हणजे, पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवरही मुशाल मलिक यांनी काश्मिरी जनता पाकिस्तान सरकारविरोधात नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी पाकिस्तान सरकार आणि JAAC यांच्यात संवाद सुरू करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करण्याची तयारीही दर्शवली आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
  • रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा आंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच…
  • Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय…
  • शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?
  • CJP Delhi Protest : ‘कॉकरोच’ पुन्हा दिल्लीत धडकणार, 5 सप्टेंबरला…सीजेपीची मोठी घोषणा; नवं आंदोलन पेटणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in