
कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर आंदोनल केल्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीला मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. येत्या इंडिया गेट ते नवी दिल्ली पोलीस मुख्यालय असा मार्च काढण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर रोजी हा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. 25 जुलै रोजी झालेल्या जंतरमंतर रोजी आंदोलनानंतरची आश्वासन सरकारने पाळली नसल्याचा दावा सीजेपीने केला आहे.
CJP ने येत्या ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. आम्हाला दिल्लीतील निदर्शनानंतर २५ जुलैला सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा CJP चा आरोप केला आहे. इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. NEET पीडितांच्या कुटुंबीयांसह पोलीस अत्याचाराचे पीडित देखील या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे.
१८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने FIR ची यादी मागूनही सरकारने स्पष्ट आश्वासन दिले नसल्याचा दावा सीजेपीने केला आहे. सरकारने शब्द पाळावा, अशी मागणी सीजेपीने केली आहे. शहरातील तरुणांनी येत्या ५ सप्टेंबरला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही सीजेपीने केले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply