
नेपाळमधील पूरस्थितीमुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक अडकले होते. या संकटग्रस्त भाविकांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अडकलेल्या भाविकांचा सागावून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू झाला आहे. हे ३७ भाविक ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली येथील परिसरातील आहेत. ते जय गिरनारी ट्रस्ट अलिबागचे प्रमोद केणे यांच्यासोबत कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने त्वरित हालचाली केल्या. याचबरोबर, नेपाळमध्ये मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीम देखील दाखल झाली आहे. शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल यांच्या नेतृत्वाखाली मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. संकटग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याची मदत पुरवली जात आहे. स्थानिक प्रशासनाशी आणि नागरिकांशी समन्वय साधून तातडीने आवश्यक असलेले साहित्य पोहोचवण्याचं काम सध्या सुरू आहे.
Leave a Reply