
नरसापूर प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्याला येत्या सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. तुला कोणती शिक्षा देऊ? असा सवाल कोर्टाने आरोपीला केला. गुन्हा अत्यंत गंभीर असल्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलाने केली आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय देतं हे चार दिवसानंतर समजणार आहे. कोर्टाने अत्यंत जलदगतीने हे प्रकरण हाताळलं आहे. कोर्टाने आरोपीला दोषी ठरवल्यानंतर सरकारी वकिलांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या घटनेची एक एक माहिती दिली.
या विकृताला जगण्याचा अधिकार नाही. तो आधी दोन गुन्ह्यात होता. तांत्रिक कारणामुळे तो सुटला. त्यामुळे त्याला जन्मठेप दिली तर तो तेच कृत्य करेल. म्हणून त्याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही कोर्टाला केली आहे. मृत्यूदंड देताना घाई गर्दीत देता येत नाही. तसे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. केस लॉ आहेत. त्याचा अभ्यास करून या प्रकरणावर कोर्ट निर्णय देईल, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.
82 साक्षीदार…
या प्रकरणात एकूण 82 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तर, 16 दिवसात 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. आरोपीने पीडितेचे 39 मिनिटे शोषण केलं होतं. पीडितेच्या अंगावर 18 जखमा होत्या. आरोपी आणि मयताचा डीएनए मिळाला होता. मुलीच्या तोंडात कोंबलेल्या बोळ्यात आरोपीची लाळ सापडली. अंगावर रक्त सापडलं. या प्रकरणआत प्रत्यक्ष साक्षीदार कोणी नव्हता. पण या आरोपीसोबत मुलीला अखेरचं पाहण्यात आलेलं आहे. नरसापूरमधील 6 सीसीटीव्हीचं डिटेल विश्लेषण करण्यात आलं आहे. त्यावरून आरोपीनेच हे कृत्य केल्याचं सिद्ध झालं आहे, असं वकिलाने सांगितलं.
युक्तिवाद होणार नाही…
आरोपी लैंगिक कृत्यासाठी सक्षम आहे की नाही त्याचे रिपोर्ट घेण्यात आले. इतर रिपोर्ट आले आहेत. आरोपीला कायद्याची भीती नव्हती. पोलिसांसमोर मोठं चॅलेंज होतं. एसआयटीने अहोरात्र काम केलं. कोर्टाला तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी तारीख ठेवली आहे. कोर्टात सोमवारी युक्तिवाद होणार नाही, थेट निर्णय येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सेम केस
बच्ची सिंग आणि बच्चन संग प्रकरणात आणि या प्रकरणात साम्य आहे. थंड डोक्याने गुन्हा झाला आहे. मुलगी हेल्पलेस होती. त्याने मुलीची रेकी केली. आजीसोबत मुलगी राहते. आजीसोबत राहत असल्याने त्याने तिला टार्गेट केलं. घटनेच्या दिवशी मुलांना दगड मारून शिवीगाळ करून हाकलून दिलं. त्यानंतर तो मुलीला घेऊन गेला. त्यानंतर मुलं परत आले, तेव्हा त्याने मुलांना परत दगड मारले. त्यामुळे त्याला फाशी दिली पाहिजे, ही मागणी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Leave a Reply