
मराठी सक्तीवरुन आंदोलनं करणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिला आहे. काल कांदिवली लिंक रोडवर लालजी पाडा येथे रिक्षा चालकांनी बेकायद आंदोलन केलं. त्यांनी रिक्षा रोखून ट्रॅफिक जॅम केलं. मराठी बोलणार नाही अशी मुजोरी हे रिक्षा चालक दाखवत होते. आता या अमराठी रिक्षाचालकांविरोधात मनसेने दंड थोपटले आहेत. कांदिवली पश्चिममध्ये मनसेने अमराठी रिक्षाचालकांना इशारा दिला आहे. ‘मराठी शिकण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा, ही शेवटची नम्र विनंती’. संप करून मुंबईकरांना वेठीस धरल्यास मनसे गप्प बसणार नाही असा इशारा बॅनरवरुन देण्यात आला आहे. कांदिवली पश्चिममध्ये मराठी रिक्षा चालकाला मारहाण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसेने कांदिवली पश्चिममध्ये अमराठी रिक्षाचालकांना इशारा देणारे बॅनर लावले आहेत. ‘अमराठी रिक्षा चालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा…!!’ असं या बॅनरवर लिहिलं आहे. मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरलं तर मनसे गप्प बसणार नाही, ही शेवटची नम्र विनंती. मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी हे बॅनर लावले असून अमराठी चालकांनी मराठीचा सन्मान करावा असा इशारा त्यांनी दिला आहे.
अमराठी ऑटो रिक्षा चालक बोरीवली आरटीओ कार्यालयात जमा
दरम्यान अमराठी रिक्षा चालकांवर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान मोठ्या संख्येने अमराठी ऑटो रिक्षा चालक बोरीवली आरटीओ कार्यालयात जमा झाले आहेत. काल मुंबईच्या वेगवेगळ्या भागात अमराठी रिक्षा चालकांनी आरटीओच्या कारवाईला विरोध करत संप पुकारला होता. या संपादरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ आणि हंगामा झाल्याचे पाहायला मिळाले होते.आरटीओकडून मराठी भाषा संदर्भात सुरू असलेल्या कारवाईमुळे अमराठी चालकांमध्ये नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर आज मोठ्या संख्येने ऑटो रिक्षा चालक बोरीवली आरटीओ कार्यालयात जमा झाले आहेत.
किमान मराठी बोलता यावं, अशी या रिक्षा चालकांकडून अपेक्षा आहे. पण इतकी व्यवहारिक मराठी सुद्धा न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरु झाली आहे.
Leave a Reply