• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Manoj Jarange Patil: जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या…मनोज जरांगेंनी थोपटले दंड, दोन-चार लोकांसाठी…

May 3, 2026 by admin Leave a Comment


Manoj Jarange Big Statements on Neknoor Clashes: खास आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यातील नेकनूरमध्ये दोन गटात चांगलाच राडा झाला होता. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली होती. हरिनाम सप्ताहाच्या सांगतेवेळी अगदी किरकोळ कारणावरून हा वाद पेटला होता. मनोज जरांगे पाटील हे काल नेकनूर येथे आल्यानंतर त्यांनी सूचक इशारा दिला आहे. जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या. आमच्यावर केसेस झाल्यानं काही फरक पडत नाही असा सूचक इशारा त्यांनी दिला. तर त्याचवेळी दोन्ही समाजाला त्यांनी मोठे आवाहनही केले आहे. दोन-चार लोकांसाठी सर्वांनाच यात दोषी धरू नये असे जरांगे पाटील म्हणाले.

जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या

सर्व समाजातील, धर्मातील लोकं ही गुण्यागोविंदानं नांदतात. एक दोन तसं वागतात. त्याची काळजी करायची नाही. आम्ही कशासाठी आहोत? आम्हाला दुसरं काही काम नाही. केसेस दाखल आहेत. आम्हाला काही नोकऱ्या लागणार नाही. होऊ द्या जे व्हायचं ते असे सूचक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. पण सर्वांना दोषी धरायचं नाही. बाकीच्यांचा काही दोष नाही. दोन-चार लोकांसाठी सर्वांना यात दोषी करू नये असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

नेकनूरमध्ये काय घडलं?

बीडच्या नेकनूरमध्ये हरिनाम सप्ताह सांगता सुरू असतानाच संध्याकाळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. चालकासह रिक्षातील महिलांना आणि लहान मुलाला मारहाण झाली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. थोड्याच वेळात दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. दोन्ही गट आमने-सामने आले. घटनेची माहिती समजताच पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला.

रिक्षा चालकाचा कट लागन्याने दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकातील या वादाचे दोन गटातील राड्यात रुपांतर झाले. काहींना मारहाण झाली. दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने समाजकंटकांवर कारवाई केली. शांतता भंग केल्याप्रकरणात पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल केला आणि 11 जणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर दोन्ही समाजाने शांततेचे आवाहन केले आहे. शहरात शांतता आहे. मनोज जरांगे हे बंकटस्वामी संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमासाठी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी दोन्ही समाजाला शांततेचे आवाहन केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मला डॉक्टर व्हायचं होतं पण…, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या धनुभाऊ भाग्यवान कारण…
  • Maharashtra News LIVE : नसरापूर अत्याचार प्रकरणी भोर आणि राजगड तालुक्यात आज कडकडीत बंद
  • माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत ब्रेकअप, आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतेय ‘ती’
  • त्या नराधमाचं एन्काऊंटर झालं तरच..; भोरमधल्या चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
  • 14 मिनिटांचं हिट गाणं, ज्याने गायक एका रात्रीत बनला लोकप्रिय, 30 वर्षानंतर गाण्याची क्रेझ कायम, बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in