
नेपाळमध्ये भीषण पूर आला आहे. या पूरामध्ये आतापर्यंत १६० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. यात ७५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, परंतु मृतांचा आकडा वाढतच आहे. भारतातील किमान १३० लोक बेपत्ता आहेत, त्यापैकी बहुतेक जण मानसरोवर यात्रेवर होते. देशात साखरेचे भाव गगनाला भिडले असून आता यासाठी सरकारकडून मोठे पाऊलही उचलण्यात आले आहे. अभिजीत दिपके यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. ते आता सरकारविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत दिसत आहे. अभिजीत दिपके पाच सप्टेंबरला मोर्चा काढणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे हे दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. काल आणि आज ते नागपूर दौऱ्यावर असणार आहे. यासह राज्यातील, देशविदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Leave a Reply