
जिओ आणि एअरटेल या भारतातील सर्वाधिक ग्राहक असणाऱ्या कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्यांचे मिळून 90 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. आता या कंपन्यांच्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. या दोन्ही कंपन्या लवकरच आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत ही दरवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू शकतो. कारण मोबाईल रिचार्जसाठी आता अधिक पैसे मोजावे लागू शकतात. ऐन महागाईच्या काळात ही दरवाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
15 ते 20 टक्क्यांपर्यंत रिचार्ज महागणार
टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार जिओ आणि एअरटेल आपल्या मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. जर ही दरवाढ लागू झाली तर ग्राहकांसाठी मोबाईल सेवा वापरणे आणखी महाग होणार आहे. कारण यापूर्वीही या कंपन्यांनी अनेकदा रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा किमती वाढल्यास ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अद्याप अधिकृत घोषणा नाही
महत्त्वाची बाब म्हणजे दोनही कंपन्यांकडून अद्याप दरवाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, स्मार्टफोनच्या किमती वाढल्यानंतर आता रिचार्ज प्लॅन्सही महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेमरी चिपच्या तुटवड्यामुळे स्मार्टफोनच्या किंमती आधीच वाढल्या असून, आता रिचार्ज प्लॅन्सच्या संभाव्य दरवाढीमुळे ग्राहकांवर दुहेरी आर्थिक भार पडू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे काही कंपन्या रिचार्जची किमती वाढवत नाहीत, मात्र संबिधित प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली जातो.
नेटवर्कच्या तक्रारी वाढल्या
देशाच्या अनेक भागात आजही चांगल्या प्रकारे नेटवर्क उपलब्ध होत नाही, त्यामुळे नेटवर्कच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. ग्राहकांकडून कॉल ड्रॉप, कमी इंटरनेट स्पीड आणि नेटवर्क समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र या समस्या कायम असताना पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅन्स महाग होण्याची शक्यता आहे. याचा फटका थेट ग्राहकांना बसणार आहे.
Leave a Reply