
गॉल कसोटीनंतर कोलंबोमध्येही भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. पाचव्या दिवशी सामन्याचा निकाल अपेक्षित आहे. (Photo: Getty Image)
भारताने पहिल्या डावात 503 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात श्रीलंकेला 290 धावा करता आल्या. त्यामुळे 214 धावांनी संघ पिछाडीवर पडला आणि भारतीय संघाने फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात श्रीलंकेने 6 गडी गमावले असून फक्त 16 धावांची आघाडी घेतली आहे. (Photo: ICC Twitter)
पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ सुमारे 45 मिनिटे लवकर संपला. त्यामुळे श्रीलंकेची धावसंख्या 6 गडी बाद 229 आहे. श्रीलंकेच्या हातात फक्त 4 विकेट असून पुन्हा एकदा संघाची जबाबदारी सोनल दिनुशावर आली आहे. शेवटच्या दिवशी भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ असेल. फक्त हवामानच श्रीलंकेला पराभवापासून वाचवू शकते. (Photo: ICC Twitter)
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेला 27 वेळा फॉलोऑन मिळाला आहे. त्यापैकी 24 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर फक्त तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच एकही सामन्याचं चित्र विजयात बदलता आलेलं नाही. आता या इतिहासाची पुनरावृत्ती होणार निश्चित आहे. (Photo: ICC Twitter)
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याची ही एकूण नववी वेळ आहे. यापूर्वीच्या सर्व आठ सामन्यांमध्ये भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देऊन धुळ चारली होती आणि प्रत्येक सामना जिंकला होता. आताही तशीच स्थिती आहे. (Photo: ICC Twitter)




Leave a Reply