
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील सहावा सामना असणार आहे. गुजरातने या मोसमात सलग 2 सामने गमावले. त्यानंतर गुजरातने जोरदार कमबॅक केलं. गुजरातने पहिल्या 2 पराभवानंतर विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. तर दुसऱ्या बाजूला 2012 नंतर मोहिमेतील पहिला सामना जिंकणाऱ्या मुंबईने सलग 4 सामने गमावले आहेत. त्यामुळे आता मुंबईसमोर गुजरातचा विजयरथ रोखण्यासह आपल्या पराभवाची मालिका खंडीत करण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.
Leave a Reply