
भारतीय क्रिकेट संघ 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत आहे. त्याआधी, भारत 7 ऑगस्टपासून एक सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघ सध्या 5 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये सराव करत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने टीम इंडियाला आगामी मालिकेबद्दल सावध केले आणि श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाला कसे सामोरे जायचे हे समजावून सांगितले. गंभीरने टीम इंडियामध्ये सामील झालेल्या तीन नवीन खेळाडूंचे स्वागतही केले. वेगवान गोलंदाज आकिब नबी आणि फिरकी गोलंदाज सारांश जैन पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात सामील होत आहेत. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे नबीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला, तर वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीमुळे सारांशला संधी मिळाली. आता मालिकेपूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाला एक वॉर्निंग दिली आहे.
सुभदीप घोष श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियासोबत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आपल्या कामाला सुरुवात करत आहेत. त्यांनी टी. दिलीप यांची जागा घेतली, ज्यांचा कार्यकाळ इंग्लंड दौऱ्यासोबत संपला होता. टीम इंडियाच्या सरावापूर्वी गंभीरने नबी, सारांश आणि सुभदीप यांचे स्वागत केले. मुख्य प्रशिक्षकांनी सारांशला सांगितले की, “टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी गेल्या रणजी ट्रॉफी हंगामातील जम्मू आणि काश्मीरच्या विजयाबद्दल नबीचे अभिनंदन केले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे.”
The focus shifts to Test Cricket
Welcoming new additions to the squad as #TeamIndia begin the preparations in Colombo
WATCH
#SLvIND https://t.co/Q2IvHhneDA
— BCCI (@BCCI) August 6, 2026
बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये, गंभीर म्हणाला की, “पुढे काय आहे आणि ते का खेळत आहेत हे त्यांना माहीत आहे. त्यांनी आपले सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत आणि सर्व अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. जेव्हा 15 ऑगस्टची सकाळ येईल, मग ते प्रथम फलंदाजी असो किंवा प्रथम गोलंदाजी, त्यांनी प्रत्येक उत्तरासाठी तयार असले पाहिजे. कोणताही प्रश्न विचारला गेला तरी, त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असले पाहिजे. म्हणून, आतापासून आपण कोणतीही कसर सोडता कामा नये.”
भारताने 2008 पासून श्रीलंकेविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या संधीसाठी आगामी दोन कसोटी सामन्यांची मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संघाने सध्याच्या चक्रात तीन मालिका खेळल्या असून, त्यात एक जिंकली, एक गमावली आणि एक अनिर्णित राहिली आहे. अजून तीन मालिका बाकी आहेत. श्रीलंकेनंतर, भारत न्यूझीलंडचा दौरा करेल, जिथे ते दोन कसोटी सामने खेळतील. त्यानंतर, 2027 च्या सुरुवातीला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळले जातील.



Leave a Reply