
विवाह संस्था ही भारतीय समाजाची ओळख म्हटली जाते. मात्र, बदलत्या जीवनशैलीत आता तरुण आणि तरुणी लग्नाआधीच पार्टनर सोबत लिव्ह-इन- रिलेशनशिपमध्ये राहणे पसंद करत आहेत. तरुण आणि तरुणी आता कोणत्याही बंधनात न राहाता करिअर आणि स्वत:च्या प्रगतीवर लक्ष देत आहेत. तसेच मुले जन्माला घालणे, त्यांचे शिक्षण, पालनपोषण करणे या जबाबदारीतून मुक्त होऊन स्वछंद जगण्यास तरुण प्राधान्य देत आहेत, याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
यामुळे सरकार देखील लिव-इन नात्याला आता कायद्याच्या बंधनात आणू इच्छीत आहे. ऑक्सफर्डमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनाने एक वेगळेच चित्र समोर आले आहे. या अभ्यासात सुमारे 2,000 अविवाहित परंतू रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या महिलांचा समावेश करण्यात आला होता. त्यात 6.67 महिला आपल्या पार्टनर सोबत राहात होत्या. म्हणजे दर 100 पैकी 7 महिला लिव्ह-इनमध्ये होत्या. तर 86.9 महिला आई-वडील, इतर नातलगांकडे तर 6.45 महिला एकट्याच रहात होत्या.
या संशोधनासाठी जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये 20 शहरातून डाटा जमा केला होता आणि रिसर्च पेपर 6 जुलै 2025 रोजी प्रकाशित झाला. या संशोधनामागे किती महिला लिव्ह-इनमध्ये आहेत हेच जाणायचे नव्हते तर हे समजायचे होते की त्यांच्या नात्यांबद्दलचे विचार कसे बदलत आहेत. अभ्यासात आढळले की रोज इंटरनेटचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये स्वत:चे पार्टनर स्वत: निवडणे, प्रेम विवाहाला स्वीकारणे आणि आई-वडिलांना राजी करण्यास कमी महत्व देणे असा आधुनिक विचार अपेक्षापेक्षा जास्त आढळला. आपल्या मोबाईल किंवा डीव्हाईसने इंटरनेटचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये हा संबंध आणखी मजबूत होता. मात्र, इंटरनेटमुळे महिला लिव्ह-इनची नाते स्वीकारु लागल्या आहेत असा या संशोधनाचा रोख नसल्याचे म्हटले जात आहे.
Leave a Reply