
ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का देत सहा खासदारांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, संजय जाधव आणि भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी झाले आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हे सर्व खासदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शिंदे यांनी पुढे म्हटले की, “ज्या विश्वासाने हे खासदार आमच्यासोबत आले आहेत, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही.”
दरम्यान, या घडामोडींनंतर ठाकरे गटाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्याची तयारी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवले जाण्याचीही शक्यता आहे.
या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण तापले असून, शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
Leave a Reply