• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : हे चार लोकं तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात, यांच्यापासून जर जपूनच…

July 19, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवी जीवनामधील नातेसंबंध कसे असावेत आणि कसे असू नयेत याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच पती पत्नीचं नातं कसं असावं? पत्नीची कर्तव्य काय आहेत? पतीची कर्तव्य काय आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर आधारलेलं असतं. जेव्हा या विश्वासाला तडा जातो तेव्हा विवाह संस्थेचा पाया कमकुवत होतो आणि त्यामुळे संसार नावाचा वटवृक्ष कोसळतो. त्यामुळे कधीही विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. पती आणि पत्नी दोघांनाही एकमेकांबद्दल आदर हवा, तरच तुमचा संसार दीर्घकाळ टिकतो. परंतु या जगात असे काही लोक असतात जे लोक तुमच्या वाईटावरच टपलेले असतात. असे लोक संधी मिळताच तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात, त्यामुळे असे लोक तुम्हाला वेळीच ओळखता आले पाहिजेत. अशा लोकांपासून तुम्ही सावध असलं पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

विश्वासघातकी जोडीदार – चाणक्य म्हणतात तुम्ही पुरुष असाल किंवा महिला, जर तुम्ही तुमच्या जोडीदारा प्रति प्रामाणिक नसाल तुम्ही त्याचा विश्वासघात करत असाल किंवा तुमचा जोडीदार तुमचा विश्वासघात करत असेल तर असे नाते फार काळ टिकत नाही, तुम्ही स्वत: तुमचं नातं तुमच्या हाताने संपुष्टात आणतात. अशा व्यक्तींचा संसार हा फार काळ टीकू शकत नाही. घरात सातत्याने वाद होतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कपटी मित्र – चाणक्य म्हणतात कपटी मित्रांपासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे, असे लोक कधीही कोणाचे नसतात. मुळात त्यांच्या मनात कपटच असल्यामुळे असे लोक जरी तुमचे मित्र असले तरी देखील ते तमचं सुख पाहू शकत नाहीत. असे लोक सातत्याने तुमच्या संसारामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्हाला असे लोक वेळीच ओळखता आले पाहिजेत, तसेच या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

चुकीचा मित्र – चाणक्य म्हणतात अनेकदा आपण चुकीच्या लोकांसोबत मैत्री करतो, असे लोक आपल्याला ओळखता आले पाहिजेत. कारण हे लोक कलांतराने तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात, त्यांच्यामुळे तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो.

व्यसनी मित्र – चाणक्य म्हणतात आयुष्यात माणसाला कधीही व्यसनी मित्र नसावेत, कारण माणूस वाईट गोष्टी लगेच शिकतो. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं तर तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे अशा लोकांची संगत नेहमी टाळावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगभर नाव गाजवणारा, ‘द ग्रेट खली’ कोणत्या साईजचे बूट घालतो?
  • सोनल दिनुशाची भारताविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी, कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
  • Madhuri Dixit : प्रश्नांची सरबत्ती, स्वप्नांची कहाणी अन् मोहक अदा; ‘कोण होणार करोडपती’साठी माधुरीने का दिला होकार ?
  • तिबेटमध्ये ईशा फाउंडेशनचे ८० भक्त बेपत्ता… सद्गुरूंनी चीनकडे मोठी मागणी, व्हिडिओमध्ये भावूक झाले
  • Plane Crash : बारामतीनंतर आणखी एका ठिकाणी विमान कोसळलं; क्षणार्धात झाले अनेक तुकडे, दोघांचा मृत्यू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in