
कोलंबो कसोटी सामन्यात श्रीलंकेने फॉलोऑन मिळाल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं आहे. यात सोनल दिनुशाचा मोलाचा हातभार राहिला आहे. श्रीलंकेला संकटातून बाहेर काढताना एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. त्याच्या नावावर ऐतिहासिक नोंद झाली आहे. (Photo: PTI)
भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्याच्या चारही डावात 50हून अधिक धावा करणारा सोनल दिनुशा हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने गॉल आणि कोलंबो दोन्ही कसोटीच्या चारही डावात 50 हून अधिक धावांची नोंद केली आहे. (Photo: PTI)
सोनल दिनुषाने गॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 100 धावा, दुसऱ्या डावात नाबाद 84 धावा केल्या होत्या. कोलंबोतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 103 आणि दुसऱ्या डावात 80हून अधिक धावा केल्या आहेत. (Photo: PTI)
भारताविरुद्ध दोन कसोटीच्या चारही डावात 50 हून अधिक धावा करत सोनल दिनुषाने विक्रम रचला आहे. तसेच या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. (Photo: PTI)
सोनल दिनुशा हा श्रीलंकेसाठी पहिला फलंदाज ठरला आहे. ज्याने सहाव्या किंवा त्यापेक्षा कमी स्थानावर फलंदाजी करताना भारताविरुद्ध कसोटी मालिकेत एकापेक्षा अधिक शतकं ठोकली आहेत. (Photo: PTI)




Leave a Reply