
ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्थमान यांनी इंडियन एअर फोर्सच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. बालाकोट एअर स्ट्राइक नंतर झालेल्या हवाई संघर्षात अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानचं F-16 फायटर विमान पाडलं होतं. 27 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरच्या आकाशात भारत-पाकिस्तानच्या फायटर विमानांमध्ये डॉग फाईट झाली होती. त्यावेळी वर्थमान यांनी पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडलं होतं. पण त्यावेळी त्यांचं मिग-21 बायसन विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलेलं. ते दोन दिवस पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. भारत सरकारच्या कणखर भूमिकेमुळे पाकिस्तानला कुठल्याही वाटाघाटीशिवाय त्यांना दोन दिवसात सोडावं लागलेलं. 27 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरच्या आकाशात अभिनंदन वर्थमान यांनी आपल्या मिग-21 बायसन विमानाद्वारे जो पराक्रम दाखवला, त्यासाठी त्यांना वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं. एअर फोर्समधील नोकरीचा राजीनामा देऊन ते आता खासगी एअरलाइन्समध्ये नोकरी करणार आहेत. एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांना वर्थमान यांच्या राजीनाम्याची कल्पना आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply