
Abhijeet Dipke CJP: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय बनले आहे. आधी आंदोलन आणि आता त्यांची सुरु असेलली मोहिम यामुळे आता अभिजीत दिपके पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत. अभिजीत दिपके सध्या स्कूल ठिक करो या मोहिमेवर आहे. या मोहिमेअंतगर्त ते जिल्हा परिषदेच्या शाळेत जे विद्यार्थी शिकतात त्यांना उदभवणाऱ्या समस्येवर काम करत आहे. आता नुकतीच अभिजीत दिपके यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीची सध्या चर्चा सुरु आहे.
अभिजीत दिपके यांनी त्याच्या मित्र सौरव दासबद्दल एक किस्सा सांगितला आहे. न्यूज24 ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दीपके म्हणाले की, मार खाऊनही आम्ही पुन्हा उभारी घेणारे लोक आहोत. मला मारहाण झाली, त्याला (आशुतोष रांका) मारहाण झाली आणि आता फक्त सौरव उरला आहे. सौरव तुझी पण वेळ येणार आहे.” दिपके हे जरी गंमतीत बोलला असला तरीही त्याने सौरवला थेट इशारा दिला आहे.
या वर्षी जूनमध्ये राजस्थानमधील जयपूर येथे एका आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला झाला होता. जयपूरमध्ये जमलेल्या आंदोलकांना संबोधित करण्यासाठी जात असताना दीपे यांच्या एका समर्थकाने त्यांना खांद्यावर उचलले. यावेळी जमावातील काही लोकांनी त्यांना कानाखाली मारली आणि खाली खेचण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
दीपके यांनी आरोप केला आहे की, या हल्ल्यामागे आरएसएसशी संबंधित काही लोक होते. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा एक प्रयत्न होता. गेल्या आठवड्यात राजस्थानमध्ये सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि काही कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. जयपूरच्या बागरू विधानसभा मतदारसंघातील एका सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी जात असताना रांका आणि सीजेपी कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. रांका यांनी सांगितले की, “या हल्ल्यात एका सीजेपी कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाला. या घटनेत भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा” आरोप रांका यांनी केला.
Leave a Reply