• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

17 सप्टेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप? काय होणार? अखेर संजय राऊत काय म्हणाले?

September 4, 2026 by admin Leave a Comment


येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. पण पहिल्यांदाच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. चार मंत्र्यांनी राजीनामे देण्यास नकार दिल्याने मोदी सरकारचा विस्तार थांबला आहे. ही भाजपच्या अध:पतनाची सुरुवात आहे. त्यातच संघानेही उपपंतप्रधानपदावर मोदींचा वारस बसवण्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडी बरंच काही सांगून जातात, असं सूचक विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत कोल्हापुरात होते. दिनमान साहित्य उत्सव पर्व 2ला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी हे सूचक विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. तुम्ही वारंवार सप्टेंबरमध्ये मोठं काही घडणार असल्याचा दावा करत असता, काय घडणार आहे सप्टेंबरमध्ये असं? असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावर राऊत यांनी थेट भाजपच्या अंतर्गत बंडाळीवर बोट ठेवून पक्षातील मोदी आणि शाह यांचा वर्चस्व संपुष्टात आल्याचं अधोरेखित केलं.

मंत्र्यांचा स्पष्ट नकार

सप्टेंबर आला आहे, येऊ द्या. मी 17 सप्टेंबरची तारीख दिली आहे. या दिवशी मोदींचा वाढदिवस आहे. या क्षणी भाजपात पहिल्यांदाच बंडाळीचं स्वरुप वाढलं आहे. गेल्या 10 वर्षात ते नव्हतं. पक्षात मोदी आणि शाह यांची दहशत होती. ती आता नाहीये. त्यामुळेच मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदल करू शकले नाहीत. जुने मोदी असते तर मोडून तोडून बरखास्त केले असते. पण चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. हे चारही मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे, असं राऊत म्हणाले.

भाजपात बंड वाढणार

मोठा फेरबदल करायचा असतो तेव्हा मंत्र्यांचे राजीनामा घेतात. मंत्र्यांची राजीनामे घेतल्यानंतर फेरबदल केला जातो. पण या मंत्र्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आम्ही राजीनामा का द्यायचा? याचं उत्तर द्या. आधी अमित शाह यांचा राजीनामा घ्या. त्यांना वगळून आम्ही राजीनामे का द्यायचे? असा सवाल हे मंत्री करत आहेत. मोदींच्या पतनाची ही सुरुवात आहे. हळूहळू बंड वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे.

मोदींच्या पतनाची सुरुवात

संघालाही आता एक नवीन ऊर्जा प्राप्त होताना दिसत आहे. त्यांनी फेरबदलात उपपंतप्रधान नियुक्त करण्याची मागणी केली आहे. हा उपपंतप्रधान तुमचा वारस असेल असं त्यांनी म्हटलंय. तो वारस अमित शाह नसणार. संघाचं हे सांगणं आणि त्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार रोखून ठेवणं याचा अर्थ मोदींची दहशत, अमित शाहांच्या दादागिरीला ब्रेक लावण्याचं काम सुरू झालं आहे. इंटरनॅशनल फोर्सेसचं भारतावर लक्ष आहे. त्यांना मोदींचं ओझं झालंय. हा भंपक माणूस आहे. थापाड्या आहे. खोटरडा आहे, याच्यावर जगाचं एकमत झालं आहे. त्यामुळे मी सांगतो मोदींच्या पतनाची सुरुवात सुरू होत आहे. एकदा पतन सुरू झालं की गाडीचा वेग कमी होऊन गाडी खाली जाणार आहे, असा दावाही त्यांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
  • पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
  • Akshaye Khanna : अक्षय खन्नाने एक-दोन नव्हे लगावल्या तब्बल 17 थप्पडा; ‘त्या’ कलाकाराचा चेहरा सुजून लालेलाल, सेटवर उडाली खळबळ
  • PCOS : सावधान! सडपातळ मुलींनाही होऊ शकतो हा गंभीर आजार; ही लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा!
  • 11 वर्षांपासून खात होती केस, डॉक्टरांनी पोटातून काढला 1.16 किलोचा गोळा, अजब घटनेची जगभरात चर्चा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in