
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता एका क्लिकद्वारे वितरित केला. याअंतर्गत आज ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५,०८६ कोटी जमा करण्यात आले.
यापूर्वीच्या हप्त्यासह आतापर्यंत १२ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटी वितरित करण्यात आले आहेत.
यावेळी फडणवीस म्हणाले की, सर्व पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ₹५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देखील पुढील टप्प्यात त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
Leave a Reply