
भारतीय खाद्यसंस्कृतीत चपातीला खास स्थान आहे. गव्हाच्या आट्यापासून चपाती बनते. अनेक घरांमध्ये चपातीशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. काहींना अगदी गरमगरम मऊ चपाती खायला आवडते. पण कधी कधी चपाती बनवली तर ती फुगत नाही. खाण्याच्या वेळेपर्यंत अगदी कडक होते.
चपाती बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. दररोज चपात्या करूनही कणिक मळण्यात काही चुका होतात. त्यामुळे चपात्या वातड किंवा कडक होतात आणि नीट फुगत नाहीत. जर तुमच्याही चपात्या नीट होत नसतील, तर खाली दिलेल्या सोप्या टिप्स फॉलो करा. मऊ आणि गोल चपात्या हव्या असतील तर कणिक मळताना या गोष्टी लक्षात ठेवा…
मऊ चपात्यांसाठी कणिक मळण्याचे सिक्रेट
-कणिक किमान ८ ते १० मिनिटे चांगली मळून घ्या. यामुळे ग्लूटेन नीट तयार होते आणि चपात्या मऊ येतात.
-कणिक मळताना थंड पाणी वापरू नका. शक्यतो कोमट पाणी वापरा. यामुळे कणिक मऊ आणि लवचिक होते.
-कणिक मळून झाल्यानंतर लगेच चपात्या लाटू नका. कणिक झाकून किमान १५-२० मिनिटे विश्रांती घेऊ द्या.
-अधिक मऊपणासाठी कणिक मळताना थोडे दूधही मिसळू शकता.
वाचा: दुकानात आले तर तुकाराम मुंढे राजिनामा देतील… कचोरी दुकानाच्या मीम्सचा इंटरनेटवर धुमाकूळ
लाटताना आणि भाजताना काय करावे
-चपात्या लाटताना हलक्या हाताने लाटा. काठ जाड ठेऊ नका, नाहीतर ते नीट भाजत नाहीत.
-चपात्या भाजण्यापूर्वी तवा नीट गरम करा. नंतरच चपाती टाका.
-गॅसची फ्लेम जास्त ठेऊ नका. मध्यम आचेवर भाजा, म्हणजे चपात्या समान रीतीने भाजतील आणि फुगतील.
या सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या चपात्या मऊ, फुगलेल्या आणि स्वादिष्ट येतील. त्यामुळे चापात्या बनवताना वर दिलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा.
Leave a Reply