
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुरु असलेली सुनावणी आज संपली असून, आता पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. २०१३ मध्ये पक्षप्रमुख पद निर्माण केले आणि २०१८ मध्ये घटनेत बदल केले, पण त्यानंतर पक्षांतर्गत नियुक्त्या लोकशाही पद्धतीने झाल्या नाहीत, असा युक्तिवाद कौल यांनी केला. त्यांनी निवडणूक आयोगाने वेळोवेळी निवडणुका घेण्यास सांगितले होते, याकडे लक्ष वेधले. कौल यांना त्यांच्या युक्तिवादासाठी आणखी चार तास अपेक्षित आहेत.
Leave a Reply