• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राम मंदिरातील देणगी चोरी ही क्षुल्लक बाब..; अनुपम खेर यांच्या वक्तव्यावर भडकले नेटकरी, ट्रोलर्सना दिलं प्रत्युत्तर

July 13, 2026 by admin Leave a Comment


राम मंदिरातील देणगी चोरीवर टिप्पणी केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. राम मंदिरातील चोरी ही एक किरकोळ गोष्ट आहे, असं ते म्हणाले होते. “मुघलांनी देशाकडून जे काही लुटलं त्याच्या तुलनेत दोन ते सात कोटी रुपयांची कथित अनियमितता काहीच नाही. मुघल नेत्यांनी फक्त पैसाच नाही तर हिंदूंचा सन्मानही लुटला आहे,” असं वक्तव्य अनुपम खेर यांनी केलं होतं. यामुळे त्यांना सोशल मीडियावर तीव्र ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता अनुपम खेर यांनी कोणाचंही नाव न घेता पोस्ट शेअर करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अनुपम खेर?

‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले होते, “राम मंदिरातील देणग्यांच्या चोरीचा मुद्दा हा खूप छोटा विषय आहे. इतिहासात मंदिरांचा विध्वंस, लूटमार, तसंच हिंदूंवर झालेले अत्याचार हे त्याहून मोठे मुद्दे आहेत. जेव्हा मुघलांनी आपली मंदिरं तोडली होती, जेव्हा ब्राह्मणांची हत्या करण्यात आली होती, जेव्हा मंदिरांमधील धन लुटण्यात आलं होतं, महिलांवर अत्याचार झाले होते, या सर्वांत मोठ्या घटना होत्या. जर आपण त्या वेदनेतून पुढे येऊ शकतो, तर त्या तुलनेत ही खूपच छोटी गोष्ट आहे.” त्यांच्या याच वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी टीका केली.

अनुपम खेर यांची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

आता ट्रोलिंग होत असतानाच अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘प्रामाणिक व्यक्तीची सर्वांत मोठी संपत्ती म्हणजे त्याची निर्भयता. ज्याच्या मनात चोर नसतो, तो कधीही मान झुकवत नाही.’ इतकंच नाही तर त्यानंतर अनुपम खेर यांनी आणखी एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटलंय, ‘लोकप्रिय असणं चांगलं वाटतं. पण प्रत्येकाचं आवडतं बनण्याच्या प्रयत्नात आपण अनेकदा स्वत:पासून दूर जातो. स्वत:च्या नजरेत एक चांगला माणूस म्हणून राहणं ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, हे मी शिकलोय. बाकीच्या जगाची मतं काळानुसार बदलतात. तुमच्या जगात खरोखर किती लोकं महत्त्वाची आहेत? कधीतरी याचा विचार करा. संपूर्ण जगात लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करू नका. ते गरजेचंही नाही आणि योग्यही नाही.’

टीकाकारांना उत्तर-

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांनी या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलं नाही, पण सोशल मीडियावरील टीकाकारांना त्यांनी याद्वारे प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनुपम खेर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाचं खुलेपणाने समर्थन करताना दिसतात. मात्र राम मंदिरातील देणगीच्या चोरीबाबत त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in