
अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अमरावती येथे तीन बालकांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. या गंभीर घटनेनंतरही पालकमंत्री राजस्थानमध्ये पाणीपुरी खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री म्हणून बावनकुळे यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “पालकमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून रुग्णालयासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या असत्या, तर कदाचित या बाळांचा जीव वाचला असता,” असे अंधारे म्हणाल्या.
पालकमंत्र्यांनी अशा दुःखद प्रसंगी जिल्ह्यात उपस्थित राहण्याऐवजी पाणीपुरी खाण्यात मग्न राहणे हे निगरगठ्ठापणाचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार नितीन देशमुख यांनीही पालकमंत्र्यांच्या अतिशय गलथान कारभारावर जोरदार टीका केली आहे. आपल्या जिल्ह्यात अशी घटना घडलेली असतानाही पालकमंत्र्यांनी इतकी बेफिकीरी दाखवणे हे अत्यंत संतापजनक असल्याचे देशमुख यांनी नमूद केले आहे.
Leave a Reply