• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मैत्रिणीशी बोलला… रात्री अचानक ब्लॅक स्कॉर्पिओ आली आणि… MPSCच्या विद्यार्थ्याचं अपहरणाने पुणे हादरलं

September 10, 2026 by admin Leave a Comment


कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असलेलं पुणे शहर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरुगेटजवळूनच या विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आल्याने पुणेकरांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पुणेकर आधीच बेजार झाले आहेत. त्यात आता या नव्या घटनेची भर पडल्याने पुणेकरांची चिंता वाढली असून गुन्हेगारीला पायबंद घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

पेरूगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नारायण पेठेतून या विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं आहे. प्रसाद सूर्यवंशी असं या 28 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रसाद रात्री नारायण पेठेत एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होता. तेवढ्यात एक ब्लॅक फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ आली. या दोन्ही कारमधून एकूण 10 जण उतरले आणि त्यांनी प्रसादला कारमध्ये टाकून फिल्मी स्टाईलने पलायन केले. यावेळी पोलिसांनी कारचा पाठलाग करत प्रसादची सुटका केली. रात्री उशिरापर्यंत हा थरार सुरू होता. पोलिसांनी दोन आरोपी आणि स्कॉर्पिओही ताब्यात घेतली आहे. बाकी आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या अपहरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कारण आलं समोर

प्रसाद सूर्यवंशी या विद्यार्थ्याचं अपहरण करण्यामागचं कारण समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत बोलतो म्हणून प्रसादचं अपहरण करण्यात आलं असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. अपहरण करण्यापूर्वी त्याला भररस्त्यात मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला कारमध्ये जबरदस्ती घुसवून त्याचं अपहरण करण्यात आलं. सिंहगड रोडच्या दिशेने जात असताना परत त्याला मारहाण करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

112 वर कॉल अन् चक्र फिरली

काळ्या स्कॉर्पिओमधून हे गुंड आले होते. विशेष म्हणजे ज्या परिसरातून अपहरण करण्यात आलं, त्याच्या हाकेच्या अंतरावरच पेरूगेट पोलीस चौकी आहे. या तरुणाचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांना 112 क्रमांकावर त्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने स्कॉर्पिओचा पाठलाग करून प्रसादची सुटका केली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने सागर रमेश बोराडे आणि किशोर बाळासाहेब सावंत या दोन आरोपींनी ताब्यात घेतले. रात्री 1 वाजून 23 मिनिटांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणातील इतर चार आरोपी फरार आहेत. विश्राम बाग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान, प्रसाद सूर्यवंशी याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
  • सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर लेकीचं सडेतोड उत्तर; म्हणाली ‘काहींना इतरांचा आनंद..’
  • मुंबईनंतर दिल्लीचं महत्व संपवण्याचा खटाटोप; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर पुरावा देत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
  • Vijay Mallya: आता झुरळ होऊ का? विजय माल्या यांना का व्हायचंय कॉक्रोच? पळपुटा म्हटल्यानं का झोंबल्या मिरच्या?
  • अभिजीत दीपके देणार महाराष्ट्र सरकारला टेन्शन, पुण्यात येताच सर्वात मोठी घोषणा; आता MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in