
उद्योजक विजय माल्या यांनी पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात सुरू असलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याचे भोकाड पसरले आहे. ईडीने त्यांच्याविरोधात कथित 14,131.60 कोटींच्या वसुलीवरून त्यांची आगपाखड सुरू आहे. बँकांना आपण व्याजासहित कर्जाऊ रक्कम परत केली आहे. तरीही आपल्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. आपल्याला पळपुटा म्हटल्या जात असल्याची व्यथा माल्यांनी मांडली. ब्रिटेनमधल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे आपल्याला भारतात परतता येत नसल्याचा दावा त्यांनी केला.
केंद्र सरकारवर अन्याय करत असल्याचा आरोप
विजय माल्या पळपुटे आर्थिक आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यांनी या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तर केंद्र सरकार आपल्यावर अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे. माल्या सध्या लंडनमध्ये राहत आहेत. बुधवारी रात्री उशीरा त्यांनी सोशल मीडियावर याविषयीच्या सलग काही पोस्ट शेअर केल्या. आपल्याला अन्यायाचा सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले.
आता झुरळ होऊ का?
माल्याने सोशल मीडियावर त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. जितके अन्या मी झेलले आहेत आणि आता ही सहन करत आहे. ते पाहता मलाही वाटत आहे की, मी सुद्धा झुरळ व्हायला हवे. कदाचित झुरळ झाल्याने माझे आयुष्य थोडे चांगले होईल, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. अर्थात यातून त्यांना काय ध्वनीत करायचे आहे समोर आले नाही. कॉक्रोच जनता पार्टीसारखे ते आंदोलन करणार की त्यांच्या वाक्याचा दुसरा काही अर्थ आहे, यावरून सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. अनेकांनी माल्यांवर जोरदार फटकेबाजी केली आहे.
With all the injustices I have faced and continue to face, I wonder if I should become a cockroach. Maybe a better life on the cockroach side.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) September 9, 2026
14,000 कोटींच्या वसुलीवर माल्यांचा दावा काय?
विजय माल्या यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्राचा दाखला दिला. त्यात ईडीने हे कबूल केले आहे की, त्यांच्याकडून जवळपास 14,000 कोटीहून अधिक रुपयांची वसूली करण्यात आली आहे. 2021 मध्ये ही रक्कम त्या बँकांना परत करण्यात आली, ज्यांची थकबाकी होती, असा दावा त्यांनी केला आहे. आपल्या दाव्यावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी ईडीचे शपथपत्र एकदा वाचावे असे आवाहन त्यांनी टीकाकारांना केले आहे.
Leave a Reply