• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 मालिका, पण बांगलादेशाला बसला मोठा फटका; कारण की…

August 12, 2026 by admin Leave a Comment

India vs Afghanistan Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत तीन सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेचं वेळापत्रकही जाहीर झालं असून दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात ही स्पर्धा पार पडेल. या मालिकेचं यजमानपद अफगाणिस्तानकडे हे विशेष… या मालिकेमुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला फायदा होणार आहे. तर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा पुन्हा एकदा हिरमोड होईल. कारण भारतीय बांग्लादेश दौऱ्यावर जाणार नाही, हे या वेळापत्रकावरून स्पष्ट झालं आहे. यापूर्वी भारतीय संघ अफगाणिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आता शक्यता संपली असून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 11 ऑगस्टला टी20 मालिकेची घोषणा केली. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्या. कारण भारतीय संघाने बांग्लादेश दौरा करावा यासाठी बीसीबी पूर्ण जोर देत होती. इतकंच काय तर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतासाठी 1 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यानचा कालावधीही निश्चित केला होता. या दरम्यान, तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळण्याची योजना होती. पण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून टी20 वेळापत्रक जाहीर होताच बांगलादेशचा तिळपापड झाला आहे. या मालिकेमुळे भारतीय संघाचं बांग्लादेश दौऱ्यावर जाणं शक्यच नाही.

सलग तिसऱ्या वर्षी मालिका टाळली?

बांग्लादेश क्रिकेट बोर्ड मागच्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या संभाव्य दौऱ्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून वारंवार विनवण्या केल्या जात आहे. बांग्लादेश बोर्डाचे अध्यक्ष माजी स्टार फलंदाज तमीम इकबाल यांनी देशाच्या सरकारसोबतही वार्तालाप केला. भारत सरकार आणि बीसीसीआयला या दौऱ्यासाठी विनवणी करण्याची विनंती त्यांनी सरकारपुढे ठेवली. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट बोर्डाने या दौऱ्याबाबत काहीच म्हंटलेलं नाही. तसेच प्रस्तावही बांग्लादेश क्रिकेट बोर्डासमोर ठेवलेला नाही. त्यामुळे सलग तिसर्‍या वर्षी बांगलादेशचा प्रयत्न अयशस्वी ठरली आहे. यापूर्वी 2024 आणि 2025 मध्ये क्रिकेट दौऱ्याबाबत धुराळा उडाला होता.

भारत बांग्लादेश क्रिकेटला वादाची किनार!

बांगलादेशमध्ये 2024 नंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. राजकीय उलथापालथीमुळे दोन्ही देशांमधील राजकीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. इतकंच काय तर बांगलादेशमधील अंतर्गत राजकीय अस्थिरता आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे भारतीय क्रिकेटपटूंना तेथे पाठवणे जोखमीचे मानले जात आहे. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप 2026 दरम्यान बांगलादेशने सुरक्षेचे कारण पुकारून भारतात येण्यास नकार दिला होता. त्यामुळे बांग्लादेश दौरा वारंवार पुढे ढकलला जात किंवा टाळला जात आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in