
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांच्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे. ‘मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत’ असं म्हणत त्यांनी जरांगेंना घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
हे बघा ताईंनी सांगितलं आहे ना मग जेवायला पण जाऊ ना. ताईंनी सांगितलं ना पण भाऊबीजेच्या वेळी. आता आंदोलन सुरु आहे. आता बहिणीने या वेळी बोलवू नये. भाऊ मैदानात असताना बोलवू नये. भाऊ संकटात जातो. बहिणीने तेवढा तरी बारकाईने विचार करावा आमचा. आज मात्र जेवायला बोलवू नये. आमच्या बहिणींने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं साडी चोळी घेऊन जातो. दिलेला शब्द आहे मनोज जरांगेचा. साडी चोळी घेऊन जातो. जेवयला जातो. फक्त आज लढायच्या मैदानातून तुम्ही जेवायला या म्हणाल तर हार पत्कारावी लागेल ताई. ताईने तो विचार आणि दृष्टीकोन आणि ती मायेची भावना आमच्या बाजूने ठेवावी असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply