• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बंडखोर खासदारांना मोठा धक्का; भाजपने अचानक साथ सोडली, घेतला महत्वाचा निर्णय

September 11, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगालमध्ये महापालिका निवडणूक होणार आहेत. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांना मोठा झटका दिला आहे. भाजपने ही निवडणूक कोणत्याही युतीशिवाय लढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये कोलकाता महापालिका, हावडानगर महापालिकेची निवडणूक होणार आहे. परंतु निवडणुकीच्या तारखेची घोषणा झालेली नाही. या निवडणुकीत बंडखोरांचा गट देखील उतरण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर हा गट नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडिया पक्षात विलीन झाला होता. यात सायोनी घोष, काकोली घोष दस्तीदार,युसूफ पठाण, सुदीप बंदोपाध्याय यांच्या नावाचा समावेश आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य म्हणाले, ‘पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकीत भाजप कोणाशीही युती करणार नाही. कोलकाता आणि हावडानगर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आणि जिंकणार. दिल्लीत NCPI सोबत एखादा करार होऊ शकतो. परंतु दिल्ली आणि कोलकातामध्ये 1500 किलोमीटरचं अंतर आहे’. भाजपच्या एका नेत्याने म्हटलं की, पक्ष स्वत:ची संघटना, नेते, कार्यकर्त्यांवर विसंबून राहू इच्छित आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर आमची पहिली निवडणूक आहे. राष्ट्रीय राजकारणात फरक असतो. NCPI ने जरी भाजपशी हातमिळवणी केली. परंतु पक्षात टीएमसीचे माजी नेते आहेत. भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधातच निवडणूक लढली होती. मागच्या निवडणुकीत काहींचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्यासोबत हातमिळवणी केली, तर चुकीचा संदेश जाईल’.

दस्तीतर यांच्यासहित दिल्लीत सर्व बंडखोर खासदारांची बैठक झाली होती. यात सायोनी घोष यांच्या नावाचाही समावेश आहे. निवडणुकीआधीच कोलकाता आणि हावडानगर महापालिकेच्या मतदारसंघ पुनर्रचनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोलकातामध्ये वॉर्डची संख्या 209 इतकी होईल. आता कोलकातामध्ये 144 वॉर्ड आहेत. तर हावडानगरमधील 50 वॉर्डची संख्या ही 68 होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस देखील महापालिका निवडणुकांची तयारी करत आहेत. त्यांच्या पक्षाचे कुणाल घोष यांनी म्हटलं की, आम्ही तयार आहोत. आम्ही चांगली कामगिरी करू. मतदारसंघ पुनर्रचनेबाबत आम्हाला आक्षेप असून सर्व लोकसंख्येच्या आधारावर केले पाहिजे. परंतु भाजप मतदारांचा विचार करून पुनर्रचना करत आहेत, असा आरोप घोष यांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
  • मिर्झापूर चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; त्या गाण्यावरून… भाजपमधील बड्या नेत्याचा आक्षेप
  • Amitabh Bachchan : 84 वर्षांचे झाले, तरी मनातली ती इच्छा अपूर्णच; अमिताभ बच्चन यांना कसली खंत ?
  • Tukaram Munde FDA: महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? मग अशी काढा परवानगी, काय आहे प्रक्रिया?
  • OTT: शेवटपर्यंत वाढत जाईल थरार; क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप, 8 एपिसोड्सची सीरिज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in